म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
ठोक मानधनावर बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर केल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी ठोक मानधनावर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला. यापुढे महापालिकेचा कारभार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच चालवावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या निर्णयाला जोरदार विरोध करत ‘कंत्राटदार बदला, परंतु कामगार तेच ठेवा’ अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
महापालिकेच्या कामाचा जादा व्याप हा कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर प्रशासनाने सुमारे ८०० कर्मचाऱ्यांची भरती करार पद्धतीने केली होती.
१० महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठोक मानधनावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा असल्याचे स्पष्ट करत ज्या कर्मचाऱ्यांची सेवाकालावधी संपेल, तसे त्यांना सेवेतून कमी करण्यात येत होते. मात्र अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने सेवा खंडित केलेल्या करार पद्धतीवरील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना करार पद्धतीवर घ्यावे लागले. दरम्यानच्या काळात प्रशासनाने एसटूओ या कंपनीची ५०० कर्मचारी पुरविण्यासाठी ९१ लाख खर्चाचा प्रस्ताव १८ मार्च रोजी प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळला. हा नामंजूर केलेला प्रस्ताव सरकारने विखंडित करावा यासाठी आयुक्तांनी तो नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. तसेच, भविष्यात कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच महापालिकेचा कार्यभार विभाग प्रमुखांनी चालवावा, असे सक्त आदेश बुधवारी आयुक्तांनी काढले. आयुक्तांच्या या भूमिकेचे पडसाद बुधवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
ठोक मानधनावर बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर केल्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी ठोक मानधनावर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला. यापुढे महापालिकेचा कारभार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच चालवावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या निर्णयाला जोरदार विरोध करत ‘कंत्राटदार बदला, परंतु कामगार तेच ठेवा’ अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
महापालिकेच्या कामाचा जादा व्याप हा कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर प्रशासनाने सुमारे ८०० कर्मचाऱ्यांची भरती करार पद्धतीने केली होती.
१० महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठोक मानधनावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची भरती बेकायदा असल्याचे स्पष्ट करत ज्या कर्मचाऱ्यांची सेवाकालावधी संपेल, तसे त्यांना सेवेतून कमी करण्यात येत होते. मात्र अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने सेवा खंडित केलेल्या करार पद्धतीवरील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना करार पद्धतीवर घ्यावे लागले. दरम्यानच्या काळात प्रशासनाने एसटूओ या कंपनीची ५०० कर्मचारी पुरविण्यासाठी ९१ लाख खर्चाचा प्रस्ताव १८ मार्च रोजी प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र स्थायी समितीने हा प्रस्ताव फेटाळला. हा नामंजूर केलेला प्रस्ताव सरकारने विखंडित करावा यासाठी आयुक्तांनी तो नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. तसेच, भविष्यात कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच महापालिकेचा कार्यभार विभाग प्रमुखांनी चालवावा, असे सक्त आदेश बुधवारी आयुक्तांनी काढले. आयुक्तांच्या या भूमिकेचे पडसाद बुधवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले.