विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांचे आंदोलन
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
किमान वेतनातील फरकासह अन्य मागण्या मान्य कराव्यात, यासाठी सोमवारी नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी शहराची साफसफाई व कचऱ्याची वाहतूक न केल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यातच सोमवारी सकाळी नवी मुंबईत अवकाळी पावसाचा शिडकाव झाल्याने ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली होती.
नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना किमान वेतन देण्यात येत आहे, मात्र त्यांना सन २०१५पासूनचा वेतनातील फरक अद्याप प्रशासनाने दिलेला नाही. या मागणीसह कामगारांच्या अन्य मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात कंत्राटी कामगारांनी महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. त्यामुळे या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात सर्वच कामगार संघटना सहभागी न झाल्याने आंदोलनाला ६० टक्के प्रतिसाद मिळाला; मात्र कचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांनी १०० टक्के सहभाग घेतल्याने कचरावाहतूक बंद पडली होती. महापालिकेने कचरा वाहतूक करणारा कंत्राटदार व साफसफाई करणारे कंत्राटदार यांना नोटिसा बजावतानाच बाहेरून मनुष्यबळ आणून साफसफाई करणे व डंपरने कचरा वाहतूक करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. तरीही शहरातल बहुतांश ठिकाणी साफसफाई व कचरा वाहतुकीचे काम बंद झाले होते. त्यात आणखी भर म्हणून सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुपारनंतर कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरली होती. सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरात ठिकठिकाणी कचराकुंड्या ओसंडून वाहत होत्या. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा समाज समता कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.
यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याकडे विचारणा केली असता कंत्राटी कामगारांच्या काही मागण्या मान्य करूनही कामगार आंदोलन करून नवी मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. नवनिर्वार्चि महापौर जयवंत सुतार यांनी प्रशासनास किमान वेतन लवकर देण्याचे आदेश दिले असले, तरी यापूर्वीही प्रशासनाने महासभेच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे. किमान वेतनाचा सरकारी ठराव सर्वसाधारण सभेत तीनदा पास होऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यत आंदोलन मागे घेणार नसल्याचे समाज समता कामगार संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी सांगितले.
कामगारांच्या मागण्या
किमान वेतन अधिनियम अंतर्गत विषेश भत्त्याची रक्कम फरकासह मिळावी. तसेच १ जुलै २०१७ते ३० ऑक्टोबर २०१७पर्यंतची थकीत रक्कम कामगारांना मिळावी. नवी मुंबई महापालिकेतील सर्व कामगारांना १९ मे २०१७रोजी महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार २४ फेब्रुवारी २०१५ पासूनच्या वेतनातील थकीत फरकाची रक्कम व उर्वरित विभागातील कामगारांना श्रेणी निहाय किमान वेतन त्वरित मिळावे. तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागाने व आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये कामगारांच्या चार टक्के ग्रॅच्युईटीची रक्कम दरमहा ५७२ रुपये व एक टक्का रजेचा पगार दरमहा १४३ रुपयांचा समावेश करून एकूण रक्कमेमध्ये ७१५ रुपयांनी वाढ करावी.
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
किमान वेतनातील फरकासह अन्य मागण्या मान्य कराव्यात, यासाठी सोमवारी नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी शहराची साफसफाई व कचऱ्याची वाहतूक न केल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यातच सोमवारी सकाळी नवी मुंबईत अवकाळी पावसाचा शिडकाव झाल्याने ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली होती.
नवी मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना किमान वेतन देण्यात येत आहे, मात्र त्यांना सन २०१५पासूनचा वेतनातील फरक अद्याप प्रशासनाने दिलेला नाही. या मागणीसह कामगारांच्या अन्य मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात कंत्राटी कामगारांनी महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. त्यामुळे या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात सर्वच कामगार संघटना सहभागी न झाल्याने आंदोलनाला ६० टक्के प्रतिसाद मिळाला; मात्र कचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांनी १०० टक्के सहभाग घेतल्याने कचरावाहतूक बंद पडली होती. महापालिकेने कचरा वाहतूक करणारा कंत्राटदार व साफसफाई करणारे कंत्राटदार यांना नोटिसा बजावतानाच बाहेरून मनुष्यबळ आणून साफसफाई करणे व डंपरने कचरा वाहतूक करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. तरीही शहरातल बहुतांश ठिकाणी साफसफाई व कचरा वाहतुकीचे काम बंद झाले होते. त्यात आणखी भर म्हणून सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुपारनंतर कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरली होती. सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शहरात ठिकठिकाणी कचराकुंड्या ओसंडून वाहत होत्या. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा समाज समता कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.
यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांच्याकडे विचारणा केली असता कंत्राटी कामगारांच्या काही मागण्या मान्य करूनही कामगार आंदोलन करून नवी मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. नवनिर्वार्चि महापौर जयवंत सुतार यांनी प्रशासनास किमान वेतन लवकर देण्याचे आदेश दिले असले, तरी यापूर्वीही प्रशासनाने महासभेच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले आहे. किमान वेतनाचा सरकारी ठराव सर्वसाधारण सभेत तीनदा पास होऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यत आंदोलन मागे घेणार नसल्याचे समाज समता कामगार संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी सांगितले.
कामगारांच्या मागण्या
किमान वेतन अधिनियम अंतर्गत विषेश भत्त्याची रक्कम फरकासह मिळावी. तसेच १ जुलै २०१७ते ३० ऑक्टोबर २०१७पर्यंतची थकीत रक्कम कामगारांना मिळावी. नवी मुंबई महापालिकेतील सर्व कामगारांना १९ मे २०१७रोजी महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार २४ फेब्रुवारी २०१५ पासूनच्या वेतनातील थकीत फरकाची रक्कम व उर्वरित विभागातील कामगारांना श्रेणी निहाय किमान वेतन त्वरित मिळावे. तसेच, घनकचरा व्यवस्थापन विभागाने व आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये कामगारांच्या चार टक्के ग्रॅच्युईटीची रक्कम दरमहा ५७२ रुपये व एक टक्का रजेचा पगार दरमहा १४३ रुपयांचा समावेश करून एकूण रक्कमेमध्ये ७१५ रुपयांनी वाढ करावी.