म. टा. वृत्तसेवा, शहापूर
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी विधवा महिलेला दमबाजी करत त्यांचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप महिलेच्या परदेशस्थित मुलींनी केला. तसेच याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिला. त्यानंतर हे संमतीपत्र अधिकाऱ्याने फाडून टाकण्याचा प्रकार शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे घडला. यानंतर महिलेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत संरक्षणाची मागणी केली आहे.
वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गात जात आ . या शेतजमिनी विशाखा धानके व त्यांच्या मुली रिमा सचिन पवार, रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आजमितीस कोणत्याही प्रकारचे कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजूर अनेक वर्षांपासून कसत आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती विनायक बापू धानके यांचे निधन झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आदिवासी ग्रामस्थांना हाताशी धरत या जमिनीवर कूळ लावण्याचा प्रयत्न सुरू केला. या संदर्भात धानके यांनी कसारा पोलिस ठाण्यात ८ जुलैला तक्रार दाखल केली होती.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी विधवा महिलेला दमबाजी करत त्यांचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप महिलेच्या परदेशस्थित मुलींनी केला. तसेच याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिला. त्यानंतर हे संमतीपत्र अधिकाऱ्याने फाडून टाकण्याचा प्रकार शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे घडला. यानंतर महिलेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत संरक्षणाची मागणी केली आहे.
वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गात जात आ . या शेतजमिनी विशाखा धानके व त्यांच्या मुली रिमा सचिन पवार, रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आजमितीस कोणत्याही प्रकारचे कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजूर अनेक वर्षांपासून कसत आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती विनायक बापू धानके यांचे निधन झाल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आदिवासी ग्रामस्थांना हाताशी धरत या जमिनीवर कूळ लावण्याचा प्रयत्न सुरू केला. या संदर्भात धानके यांनी कसारा पोलिस ठाण्यात ८ जुलैला तक्रार दाखल केली होती.