कांद्याचे भाव गडगडले
हंगामाआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव गडगडल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात एपीएमसी बाजारात १५ ते २० रुपये प्रति किलो दर असलेला कांदा सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच चार ते पाच रुपये प्रति किलोने विकला गेला. ऐरवी सरकारला अडचणी आणणाऱ्या कांद्याने अक्षरश शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
Maharashtra Times 27 Nov 2018, 2:55 am
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
हंगामाआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव गडगडल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात एपीएमसी बाजारात १५ ते २० रुपये प्रति किलो दर असलेला कांदा सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच चार ते पाच रुपये प्रति किलोने विकला गेला. ऐरवी सरकारला अडचणी आणणाऱ्या कांद्याने अक्षरश शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
सध्या राज्यासह राज्याबाहेरील कांदा उत्पादक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याा बाजार आवारात जुन्या कांद्याची आवक होत असते. यामुळे दरवर्षी जुना कांदा २० ते २५ रुपये किलो दराने विकला जात होता. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी बाजार समितीच्या कांदा-बटाटा आवारात कांद्याच्या २५० ते ३०० गाड्यांची आवक झाली. बटाट्याच्या मात्र नेहमीप्रमाणे शंभर ते दीडशे गाड्यांची आवक झाली. त्यामुळे बटाट्याचे दर स्थिर राहिले, तर कांद्याचे भाव मात्र अवघे चार ते पाच रुपये किलोपर्यंत गडगडले.
अचानक कांद्याची आवक वाढल्याने नवीन कांद्याचा हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांनी भीतीपोटी शेतातून नवीन कांदा काढून बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे. मंगळवारीही लासलगाव व अन्य बाजारात कांद्याची आवक वाढल्याने तेथेही दर कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एपीएमसीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविला आहे.
पावसाने दडी मारल्याने कांदा पीक शेतातच बारीक होते व त्याला फुलेही लागतात. म्हणून शेतकऱ्यांनी हंगामाआधीच कांदा पीक काढण्यास सुरुवात केली आहे. एपीएमसी बाजारात सध्या नाशिक, पुणे, लासलगाव, नगर आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. त्याचा परिणाम हा कांद्याच्या दरावर होऊन काद्यांचे भाव आणखी गडगडण्याची शक्यता असल्याचे कांदा बटाटा व्यापारी मोहर तोतलानी यांनी सांगितले. त्यामुळे सरकारला घाम फोडणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
हंगामाआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात नवीन कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव गडगडल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात एपीएमसी बाजारात १५ ते २० रुपये प्रति किलो दर असलेला कांदा सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच चार ते पाच रुपये प्रति किलोने विकला गेला. ऐरवी सरकारला अडचणी आणणाऱ्या कांद्याने अक्षरश शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
सध्या राज्यासह राज्याबाहेरील कांदा उत्पादक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याा बाजार आवारात जुन्या कांद्याची आवक होत असते. यामुळे दरवर्षी जुना कांदा २० ते २५ रुपये किलो दराने विकला जात होता. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी बाजार समितीच्या कांदा-बटाटा आवारात कांद्याच्या २५० ते ३०० गाड्यांची आवक झाली. बटाट्याच्या मात्र नेहमीप्रमाणे शंभर ते दीडशे गाड्यांची आवक झाली. त्यामुळे बटाट्याचे दर स्थिर राहिले, तर कांद्याचे भाव मात्र अवघे चार ते पाच रुपये किलोपर्यंत गडगडले.
अचानक कांद्याची आवक वाढल्याने नवीन कांद्याचा हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांनी भीतीपोटी शेतातून नवीन कांदा काढून बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे. मंगळवारीही लासलगाव व अन्य बाजारात कांद्याची आवक वाढल्याने तेथेही दर कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एपीएमसीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी पाठविला आहे.
पावसाने दडी मारल्याने कांदा पीक शेतातच बारीक होते व त्याला फुलेही लागतात. म्हणून शेतकऱ्यांनी हंगामाआधीच कांदा पीक काढण्यास सुरुवात केली आहे. एपीएमसी बाजारात सध्या नाशिक, पुणे, लासलगाव, नगर आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. त्याचा परिणाम हा कांद्याच्या दरावर होऊन काद्यांचे भाव आणखी गडगडण्याची शक्यता असल्याचे कांदा बटाटा व्यापारी मोहर तोतलानी यांनी सांगितले. त्यामुळे सरकारला घाम फोडणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.