मुंबईः अंबानी, कोटक यांच्यासारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस पक्ष चालत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनीच उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. पण राहुल गांधी म्हणतात की, मोदी सरकार हे अंबानी, अदानी यांचे सरकार आहे. मग राहुल गांधी म्हणतात ते खरे की, मिलिंद देवरा यांच्या सीडी, कॅसेटवर जे दिसतय ते खरे, असा सवालही तावडे यांनी केला आहे.
तावडेंची काँग्रेसवर टीका
मुंबईः अंबानी, कोटक यांच्यासारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस पक्ष चालत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ...
MT 20 Apr 2019, 4:00 am