अ‍ॅपशहर

पनवेलचा मासळीबाजार पुन्हा रस्त्यावर

नगरपालिकेच्या काळात कोणालाही न जमलेले मासळीबाजार खऱ्या मासळीबाजारात नेण्याचे मोठे जिकिरीचे काम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले होते. नगरपालिकेची महापालिका होताच कोणालाही न जमलेले पहिले काम केल्यामुळे आयुक्त शिंदे प्रसिद्धीझोतात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळीबाजार पुन्हा रस्त्यावर भरू लागला आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 3:00 am
कुणाल लोंढे, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panvel fishmarket on road
पनवेलचा मासळीबाजार पुन्हा रस्त्यावर


नगरपालिकेच्या काळात कोणालाही न जमलेले मासळीबाजार खऱ्या मासळीबाजारात नेण्याचे मोठे जिकिरीचे काम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले होते. नगरपालिकेची महापालिका होताच कोणालाही न जमलेले पहिले काम केल्यामुळे आयुक्त शिंदे प्रसिद्धीझोतात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळीबाजार पुन्हा रस्त्यावर भरू लागला आहे.

पनवेल शहरातील कोळीवाडा परिसरात पनवेलचा मोठा मासळीबाजार आहे. पनवेल तालुक्यातून अनेकजण इथे मासे खरेदी करण्यासाठी येतात. नगरपालिकेने केंद्र सरकारच्या निधीतून मासळीबाजाराचा पुनर्विकास करून अद्ययावत मासळीबाजार बांधला. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मासळीबाजाराचे उद्‍घाटन करण्यात आले. उद्‍घाटन होऊनही मासळी विक्रेत्या महिला मासळीबाजारात बसून व्यवसाय करण्यास तयार नव्हत्या. २०० ओटे असलेल्या बाजारात व्यवसाय होत नाही, अशी या महिलांची तक्रार होती. नगरपालिका प्रशासनाने कधी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास येथील महिलांच्या एकजुटीपुढे कोणीही हिंमत करीत नसे. मासळीबाजाराबाहेर असलेल्या सार्वजनिक जागेत उरण नाका, पार्किंग परिसरात व्यवसाय करीत असत. १ ऑक्टोबरला पनवेल महापालिकेची स्थापना होताच आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी कारवाईचा धडाका दाखवत मासळी विक्रेत्यांना मासळी बाजारात बसण्याची सक्ती केली. महिलांनी मोठा विरोध करूनही शिंदे यांनी दोनशेहून अनेक व्यावसायिक महिलांना आत बसविण्यास भाग पाडले. पुढील काही महिने आत बसल्यानंतर महिलांनी पुन्हा सार्वजनिक रस्त्यावर ठाण मांडले असून महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे तोडणाऱ्या महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.

उरण नाक्यावर बुधवार, शुक्रवा, रविवारी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. कोळीवाड्यात जाणारा मार्ग मासळीविक्रेत्या महिलांनी व्यापून गेल्यामुळे उरण नाक्यावरून कोळीवाड्यात जाणारा रस्ता बंद झाला आहे. सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. रविवारी सकाळपासून ग्राहकांच्या गाड्यांची गर्दीमुळे बाजारात चालण्यासाठी जागादेखील शिल्लक रहात नाही. बाजार मासळीबाजारात असताना उभे राहून मासळी खरेदी सोपे जात होते, असे ग्राहक सांगत आहेत. पालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्राहक स्मिता पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज