म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
वाशीतील पालिका रुग्णालयाची विस्कटलेली घडी अजूनही नीट होऊ शकलेली नाही. बाहेरून येणे अपेक्षित असलेले डॉक्टरही रुग्णालयात हजर झाले नसल्याने रुग्णालय केवळ नावासाठी सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची परवड अजूनही सुरूच आहे. केवळ किरकोळ उपाययोजना करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामुळे संपूर्ण रुग्णालय रिकामे झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाची साडेतीनशे रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र सध्या या रुग्णालयात महिला आणि पुरुष औषध विभाग पूर्णपणे रिकामे आहेत. अतिदक्षता विभागात स्त्रीरोग विभागाचे दोन रुग्ण आहेत. आपत्कालीन विभागात दोन रुग्ण आहेत. पुरुषांच्या शस्त्रक्रिया विभागात १३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, महिला शस्त्रक्रिया विभागात १८ रुग्ण आहेत. बालरोगविभागात १३ मुले उपचार घेत आहेत, तर प्रसूती विभागात १३ महिला उपचार घेत आहेत.
सध्या केवळ किरकोळ प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र मुख्य आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, कारण त्यासाठी लागणारे डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कोणत्याही रुग्णाला योग्य उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे थोडा गंभीर रुग्ण आला की त्यांना नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात किंवा सायन रुग्णालयात पाठविले जात आहे. त्यांमुळे नेहमी गजबजलेले रुग्णालय आता ओस पडले आहे.
औषध विभागाचे डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला फिटनेस प्रमाणपत्र कोण देणार, हा प्रश्न आहे. शिवाय त्याच्यासाठी कोणती औषधे द्यावीत, हे कोण ठरवणार ही समस्याही सर्वांपुढे उभी असते. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना, रुग्णालयात किरकोळ उपाय करून परत पाठवावे लागत आहे. आधीच रुग्णालयात औषधांचा तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागतात. त्यात आता डॉक्टरांच्या नसण्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता डॉक्टरची बाजू समजून घेऊन यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी उपचारासाठी येणारे रुग्ण व्यक्त करत आहेत.
वाशीतील पालिका रुग्णालयाची विस्कटलेली घडी अजूनही नीट होऊ शकलेली नाही. बाहेरून येणे अपेक्षित असलेले डॉक्टरही रुग्णालयात हजर झाले नसल्याने रुग्णालय केवळ नावासाठी सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची परवड अजूनही सुरूच आहे. केवळ किरकोळ उपाययोजना करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामुळे संपूर्ण रुग्णालय रिकामे झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाची साडेतीनशे रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र सध्या या रुग्णालयात महिला आणि पुरुष औषध विभाग पूर्णपणे रिकामे आहेत. अतिदक्षता विभागात स्त्रीरोग विभागाचे दोन रुग्ण आहेत. आपत्कालीन विभागात दोन रुग्ण आहेत. पुरुषांच्या शस्त्रक्रिया विभागात १३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, महिला शस्त्रक्रिया विभागात १८ रुग्ण आहेत. बालरोगविभागात १३ मुले उपचार घेत आहेत, तर प्रसूती विभागात १३ महिला उपचार घेत आहेत.
सध्या केवळ किरकोळ प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र मुख्य आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, कारण त्यासाठी लागणारे डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने कोणत्याही रुग्णाला योग्य उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे थोडा गंभीर रुग्ण आला की त्यांना नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात किंवा सायन रुग्णालयात पाठविले जात आहे. त्यांमुळे नेहमी गजबजलेले रुग्णालय आता ओस पडले आहे.
औषध विभागाचे डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला फिटनेस प्रमाणपत्र कोण देणार, हा प्रश्न आहे. शिवाय त्याच्यासाठी कोणती औषधे द्यावीत, हे कोण ठरवणार ही समस्याही सर्वांपुढे उभी असते. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना, रुग्णालयात किरकोळ उपाय करून परत पाठवावे लागत आहे. आधीच रुग्णालयात औषधांचा तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागतात. त्यात आता डॉक्टरांच्या नसण्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता डॉक्टरची बाजू समजून घेऊन यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी उपचारासाठी येणारे रुग्ण व्यक्त करत आहेत.