नवी मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे होणारा हवामान बदल, तापमानवाढ यांसारख्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी वृक्षारोपणासारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे आवश्यक आहे. वर्तमानात वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविले, तर भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी खारघरमध्ये मेट्रो मार्गालगत आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पिंपळ, कडूलिंब, चाफा यांसारखी रोपे लावण्यात आली.
खारघरमध्ये वृक्षारोपण
वाढत्या शहरीकरणामुळे होणारा हवामान बदल, तापमानवाढ यांसारख्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी वृक्षारोपणासारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे आवश्यक आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2019, 4:00 am