नवी मुंबई : सौंदर्यातून संस्कृती दर्शविणारी कविता ही सामाजिक कविता असते आणि जी कविता संस्कृतीतून सौंदर्य दर्शवित असते ती असते प्रेम कविता, असे उद्गार कवी प्रा. अशोक बागवे यांनी कवी धनराज खरटमल यांच्या 'उत्तराला जर प्रश्न पडले नसते' या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी काढले. कवी धनराज खरटमल यांच्या या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुलुंड येथे झाला. कवी धनराज खरटमल यांच्या मातोश्री रत्नमाला खरटमल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रकाशक तथा एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव हे उपस्थित होते.
कवितासंग्रह प्रकाशित
सौंदर्यातून संस्कृती दर्शविणारी कविता ही सामाजिक कविता असते आणि जी कविता संस्कृतीतून सौंदर्य दर्शवित असते ती असते प्रेम कविता, असे उद्गार कवी प्रा...
Maharashtra Times 6 Jun 2018, 4:00 am