सटाणा: पूर्वहंगामी द्राक्ष, अर्थात 'अर्ली' द्राक्षांची निर्यात करून शेतकऱ्यांना परकीय चलन मिळवून देणारा बागलाण हा महाराष्ट्रातील एकमेव तालुका आहे. मात्र, येथील द्राक्षबागांना तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मोठा फटका बसला असून, तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पूर्वहंगामी द्राक्षबागांना विमा कवच नसल्याने शेतकरी हतबल झाल्याची स्थिती आहे. परिणामी, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये युरोपसह रशियामध्ये ख्रिसमससाठी होणाऱ्या द्राक्ष निर्यातीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
पूर्वहंगामी द्राक्षशेती 'पाण्यात'!
पूर्वहंगामी द्राक्ष, अर्थात 'अर्ली' द्राक्षांची निर्यात करून शेतकऱ्यांना परकीय चलन मिळवून देणारा बागलाण हा महाराष्ट्रातील एकमेव तालुका आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2019, 4:00 am