जनआंदोलनाचा इशारा नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि गावठाण विस्तार क्षेत्रात आजपर्यंत केलेली गरजेपोटीची बांधकामे नियमित करावीत, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे सर्वांचा लढा सुरू आहे. प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या संघटना यांच्या सूचनांचा अंतर्भाव करूनच सर्वसमावेशक अशी योजना जाहीर करावी आणि नंतरच तिची अंतिम अधिसूचना प्रकाशित करावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी लावून धरली आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले असून याबाबतचा अंतिम निर्णय संकल्पित असल्याचे म्हटले आहे. सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या आणि त्यांच्या संघटनांच्या सूचनांचा समावेश करूनच त्यांच्या हिताची सर्वसमावेशक योजना आणावी, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जनआंदोलनाचा इशारानवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी
प्रकल्पग्रस्तांनी गावठाण आणि गावठाण विस्तार क्षेत्रात आजपर्यंत केलेली गरजेपोटीची बांधकामे नियमित करावीत, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे सर्वांचा लढा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 4:00 am