मुंबई : 'राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानाही महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढवणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल,' अशी अपेक्षा भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली. 'विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि, राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रपती राजवट दुर्दैवी : फडणवीस
'राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानाही महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2019, 4:00 am