वाचिक अभिनयातून राजकीय फटकेबाजी
विनोद तावडे उवाच-
* राज ठाकरे यांचे टायमिंग भरत जाधव यांच्या 'सही रे सही' इतकेच आहे.
* पुणेरी पगडीऐवजी फुले पगडी हे शरद पवार यांचे उत्तम दिग्दर्शन आहे.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्रीपर्यंत कामात व्यस्त असतात, पण ते सतत हसतमुख असतात, हे अभिनयामुळे शक्य होते.
* उद्धवजी सत्ताधारी असूनही विरोधक असल्यासारखी उत्तम भूमिका नाट्यकर्मीप्रमाणे करतात.
* सुशीलकुमार शिंदे यांनी ऊर्जा खाते सांभाळले, म्हणून ते हसतमुख असतात.
-------
संवाद दुसरा
राज यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार होतो तो क्षण...
राज उवाच-
*साखर खाल्लेल्या माणसाचा सत्कार, शिव्या खाल्लेल्या माणसाच्या हस्ते होणे हे केवळ आयोजकांमुळेच शक्य झाले.
* मी पवार साहेबांची मुलाखत घेतली. त्यानंतर आम्ही दोघे एकाच व्यासपीठावर यावे याची काळजी भाजपचे विनोद तावडे का घेतात, हे काही कळत नाही. हा योगायोग नसतो.
* मी व्यंगचित्र काढले आहे, तरी आज आंबा विषय नको. त्यांची आपत्ती मला नको.
----------