औरंगाबाद: 'स्वप्न आदर्श भारताचे, महासत्ता भारताचे' या मोहिमेअंतर्गत श्री गुजराती विद्यामंदिर येथे 'संविधान जागृती' उपक्रम घेण्यात आला. संविधान प्रचारक ऋषिकेश पवार यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावणी हेच प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. संविधान साक्षर समाज निर्माण होणे आवश्यक आहे. भारतीयत्वाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कल्याण व्हावे ही तात्विक भूमिका संविधानाची आहे, असे पवार यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
‘संविधान जागृती’ला प्रतिसाद
'स्वप्न आदर्श भारताचे, महासत्ता भारताचे' या मोहिमेअंतर्गत श्री गुजराती विद्यामंदिर येथे 'संविधान जागृती' उपक्रम घेण्यात आला...
Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am