औरंगाबाद: कामगार कल्याण उपकेंद्र, शिवाजीनगर यांच्या वतीने ताणतणाव नियोजन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षक पुरुषोत्तम चंदनकार यांनी जीवनातील ताणतणावाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. स्वतःच्या अपेक्षांमुळे आपल्याला तणावास सामोरे जावे लागते. या परिस्थितीत काय करावे यावर चंदनकार यांनी संवाद साधला. यावेळी नितीन मिटकरी, गजानन सांगळे, राजेंद्र ढाकणे, आनंद गवई, कल्याण निरीक्षक विजयानंद अहिरे उपस्थित होते. केंद्रसचालक सुवर्णा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि सुनीता बेलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश काथार व जिजा गडवे यांनी परिश्रम घेतले.
ताणतणाव नियोजन कार्यशाळेला प्रतिसाद
कामगार कल्याण उपकेंद्र, शिवाजीनगर यांच्या वतीने ताणतणाव नियोजन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली...
Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am