म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना लॉकडाऊनच्या काळात शहरातील कचऱ्याचे प्रमाण सुमारे चारशे टनने घटले आहे. त्यामुळे महापालिकेचे या कामापोटी द्यावे लागणारे दोन कोटी रुपये वाचले आहेत.महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे २०१९ पासून खासगीकरण केले आहे. महापालिकेच्या क्षेत्रात नऊ झोन ऑफिस आहेत. बंगळुरूच्या रेड्डी कंपनीला टप्प्याटप्प्याने एक एक झोन ऑफिसचा परिसर काम करण्यासाठी दिला. प्रत्येक वॉर्डात घरोघरी जावून कचरा संकलन, एकत्रिकण, केंद्रावर पोहचविणे आदी कामे कंपनीला दिले. त्यासाठी महापालिका प्रती टन १८६५ रुपये देते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापर्यंत महिन्याला साडेपाचशे टन कचऱ्याचे संकलन व वाहतूक कंपनीकडून केली जात होती. या कामाचे महिन्याला सुमारे अडीच कोटींचे बिल कंपनीकडून महापालिकेला सादर केले जात होते. मात्र, लॉकडाऊनमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा, हॉटेल, धाबे बंद आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. महिन्याला सुमारे दोनशे टन कचरा निघतो. तो आता साडेतीनशे ते चारशे टन कमी निघाला आहे.
कचरा घटल्याने दोन कोटी रुपयांची बचत
म टा प्रतिनिधी, औरंगाबादकरोना लॉकडाऊनच्या काळात शहरातील कचऱ्याचे प्रमाण सुमारे चारशे टनने घटले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2020, 4:00 am