मटा ऑनलाइन वृत्त । पनवेल
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, यापुढे जीव द्यायचा नाही, असे आवाहन करताना राज्यकर्त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचे जगणे हराम करू, असा इशाराच आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे शेतकरी कर्जमाफी संघर्ष यात्रेच्या सांगता सभेत दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सुरू असलेल्या टोलवाटोलवीचा पवार यांनी समाचार घेतला. कर्जमाफी मागण्याची शेतकऱ्यांची इच्छा नसते. उलट तो घेतलेले कर्ज फेडण्यासाठी धडपडत असतो. मात्र, आज त्याच्या पिकालाच योग्य भाव मिळत नसल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकारने पाळायला हवा. शेतकऱ्यांची टिंगल उडवू नये. अन्यथा शेतकरी या सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे पवार यांनी बजावले.
पवार यांनी ते कृषीमंत्री असताना झालेल्या शेतकरी कर्जमाफीची आठवण करून दिली. शेतकरी आत्महत्येचं वृत्त ऐकून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अस्वस्थ झाले होते. त्यांच्यासमवेत तेव्हा वर्धा आणि यवतमाळमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली होती. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी होकार दिला आणि ७१ हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं होतं, असं नमूद करताना मोदी सरकार अशाप्रकारची कर्जमाफी का देऊ शकत नाही?, असा सवाल पवार यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, यापुढे जीव द्यायचा नाही, असे आवाहन करताना राज्यकर्त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचे जगणे हराम करू, असा इशाराच आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे शेतकरी कर्जमाफी संघर्ष यात्रेच्या सांगता सभेत दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सुरू असलेल्या टोलवाटोलवीचा पवार यांनी समाचार घेतला. कर्जमाफी मागण्याची शेतकऱ्यांची इच्छा नसते. उलट तो घेतलेले कर्ज फेडण्यासाठी धडपडत असतो. मात्र, आज त्याच्या पिकालाच योग्य भाव मिळत नसल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकारने पाळायला हवा. शेतकऱ्यांची टिंगल उडवू नये. अन्यथा शेतकरी या सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे पवार यांनी बजावले.
पवार यांनी ते कृषीमंत्री असताना झालेल्या शेतकरी कर्जमाफीची आठवण करून दिली. शेतकरी आत्महत्येचं वृत्त ऐकून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अस्वस्थ झाले होते. त्यांच्यासमवेत तेव्हा वर्धा आणि यवतमाळमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली होती. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी होकार दिला आणि ७१ हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं होतं, असं नमूद करताना मोदी सरकार अशाप्रकारची कर्जमाफी का देऊ शकत नाही?, असा सवाल पवार यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यावेळी उपस्थित होते.