म. टा. प्रतिनिधी, मुंबई सर्वसामान्य नागरिकांना, प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी सुरू केलेल्या 'एसटी जल' प्रकल्पामध्ये प्रशासकीय आदेशामुळे खोडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आल्यामुळे प्लास्टिक बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्यांचा वापर करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. यामुळे प्लास्टिक बाटल्यांमधून विक्री होणाऱ्या 'एसटी जल' प्रकल्पासमोर अमंलबजावणीचा पेच निर्माण झाला आहे. प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारा बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प प्रशासकीय निर्णयाच्या तावडीत सापडल्याने रखडण्याचीही लक्षणे आहेत.
प्लास्टिकबंदीमुळे अडले 'एसटी जल'
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 4:00 am