म. टा. वृतसेवा, अलिबाग
रायगड मतदारसंघात २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा पराभव केलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा यावेळी तटकरे यांनी सुमारे ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला आणि गेल्या पराभवाचे उट्टे काढले. निकाला दरम्यान अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत १४ व्या फेरीनंतर सुनील तटकरे यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळविला.
मागील निवडणुकीत मोदी लाट असताना देखील गीते यांना फारसे मताधिक्य घेता आले नव्हते. त्यावेळी शेकाप नेत्यांचा स्वतंत्र उमेदवार उभा केला होता. यामुळे तटकरे यांचा २११० मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस अशी आघाडी होती. त्यामुळे तटकरे यांना चांगले मताधिक्य घेता आले. सरकार कोणाचेही असो मतदारांना दिलेली वचने पूर्ण करणार, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी विजयानंतर दिली. शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. श्रीवर्धन मतदारसंघात तटकरेंना सुमारे ३७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने तटकरेंचा करिष्मा तिथे असल्याचे दिसून येते.
बॅ. ए. आर. अंतुले यांना ३२ हजाराचे मताधिक्य या मतदारसंघातून यापूर्वी मिळाले होते. त्यानंतर सर्वाधिक मताधिक्य तटकरेंना या मतदारसंघाने दिले. मात्र अपेक्षित मताधिक्य असणारे अलिबाग व पेण या मतदारसंघ यावेळी तटकरेंना साथ दिली नाही. पहिल्या फेरीपासून लढत चुरशीची होणार हे दिसून आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात शिवसेनेला रोखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राष्ट्रवादीच्या या विजयामुळे अनंत गीते यांच्या विजयाची परंपंरा खंडीत झाली आहे. यापूर्वी गीते यांचा सहा वेळा विजय झाला आहे.
रायगड मतदारसंघात २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा पराभव केलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा यावेळी तटकरे यांनी सुमारे ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला आणि गेल्या पराभवाचे उट्टे काढले. निकाला दरम्यान अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत १४ व्या फेरीनंतर सुनील तटकरे यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळविला.
मागील निवडणुकीत मोदी लाट असताना देखील गीते यांना फारसे मताधिक्य घेता आले नव्हते. त्यावेळी शेकाप नेत्यांचा स्वतंत्र उमेदवार उभा केला होता. यामुळे तटकरे यांचा २११० मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस अशी आघाडी होती. त्यामुळे तटकरे यांना चांगले मताधिक्य घेता आले. सरकार कोणाचेही असो मतदारांना दिलेली वचने पूर्ण करणार, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी विजयानंतर दिली. शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. श्रीवर्धन मतदारसंघात तटकरेंना सुमारे ३७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने तटकरेंचा करिष्मा तिथे असल्याचे दिसून येते.
बॅ. ए. आर. अंतुले यांना ३२ हजाराचे मताधिक्य या मतदारसंघातून यापूर्वी मिळाले होते. त्यानंतर सर्वाधिक मताधिक्य तटकरेंना या मतदारसंघाने दिले. मात्र अपेक्षित मताधिक्य असणारे अलिबाग व पेण या मतदारसंघ यावेळी तटकरेंना साथ दिली नाही. पहिल्या फेरीपासून लढत चुरशीची होणार हे दिसून आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकाप आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात शिवसेनेला रोखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राष्ट्रवादीच्या या विजयामुळे अनंत गीते यांच्या विजयाची परंपंरा खंडीत झाली आहे. यापूर्वी गीते यांचा सहा वेळा विजय झाला आहे.