मुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना योग्य आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी जाहीर केले. 'वन नेशन वन इलेक्शन' ही संकल्पना योग्य असून त्यामुळे निवडणुकांसाठी होणारा प्रचंड खर्च कमी होईल. जनतेचा सरकारी खजिन्यातील कराच्या रुपाने निवडणुकीसाठी होणारा खर्च वाचविण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हा विचार व्यापक देशहिताचा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे, असे आठवले यांचे म्हणणे आहे.
रिपाइंचा पाठिंबा
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना योग्य आहे...
Maharashtra Times 3 Aug 2018, 4:00 am