घाऊकमध्ये १८ ते १९ रुपये किलो दर
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्व रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे कृषिमालाच्या गाड्या मुंबईपर्यंत पोहोचायला अडचण येत आहे. नाशिकमध्ये तर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कांद्याच्या चाळींमध्ये पावसाचे पाणी साचून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा या हंगामातील पन्नास टक्के कांदा पाण्यात अक्षरक्ष: बुडाला आहे. त्यामुळे घाऊक कांदा-बटाटा बाजारात मालाची आवक कमी कमी होत आहे. परिणामी मालाच्या दरात वाढ होत असून यापुढे हे दर आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत कांद्याचे भाव वाढणार असून यावर्षी कांदा सर्वांना रडवणार असल्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
घाऊक कांदा-बटाटा बाजारात नाशिक, पुणे, जुन्नर, ओतूरमधून कांद्याची आवक होत असते. यात सर्वाधिक कांदा नाशिकमधून येतो . नेहमीची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात दररोज सरासरी शंभर गाड्या कांद्याची गरज लागते. मात्र सध्या ही आवक ७० गाड्यांच्या घरात आहे. १५ ते १६ रुपये किलो असलेला कांदा १८ ते १९ रुपये किलोपर्यंत जाऊ लागला आहे. कांद्याच्या बाजारातही पावसाच्या पुराचे पाणी शिरल्याने कांदा पाण्यात अक्षरक्ष: सडला आहे. आता तो कांदा फेकून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे या यापुढे मुंबईला होणारा कांद्याचा पुरवठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
याचप्रमाणे बटाट्याच्याही ७०-८० गाड्या दररोज बाजारात येणे अपेक्षित आहे. सध्या ही आवक सरासरी ६०च्या घरात आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचीही आवक कमी आहे. लसणाच्या चार-पाच गाड्या दररोज येतात. ही आवकही पुरेशी नाही. शिवाय सध्या पावसामुळे बाजारात येणारा माल भिजलेला असतो. तो जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. बटाटा तर बहुतांश खराब झालेला येत आहे. बटाट्याला गाडीतच पाणी सुटत असल्याने तो खराब होत आहे. त्यामुळे बाजारात आल्यावर लगेचच त्याची विक्री करावी लागत आहे.
बटाट्याचे दर ९ ते ११ रुपये किलो झाले आहेत. या पूर्वी कांद्याचे दर १० ते १२ रुपये होते, तर बटाटा ७ ते ८ रुपये किलो होता. लसूण घाऊक बाजारात ५० ते ८० रुपये किलो झाला होता. तो आता ५० ते १०० रुपये किलोपर्यंत आहे. आता सर्वत्र होत असलेला पाऊस पाहता मालाची आवक अशीच होणार आहे. माल भिजून बाजारात येत असल्याने त्यातून व्यापाऱ्यांचे नुकसान अधिक होत आहे. त्यामुळ हा सर्व खर्च काढून व्यापारी मालाची किंमत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसांत मालाचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवली.
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्व रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे कृषिमालाच्या गाड्या मुंबईपर्यंत पोहोचायला अडचण येत आहे. नाशिकमध्ये तर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कांद्याच्या चाळींमध्ये पावसाचे पाणी साचून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा या हंगामातील पन्नास टक्के कांदा पाण्यात अक्षरक्ष: बुडाला आहे. त्यामुळे घाऊक कांदा-बटाटा बाजारात मालाची आवक कमी कमी होत आहे. परिणामी मालाच्या दरात वाढ होत असून यापुढे हे दर आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत कांद्याचे भाव वाढणार असून यावर्षी कांदा सर्वांना रडवणार असल्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
घाऊक कांदा-बटाटा बाजारात नाशिक, पुणे, जुन्नर, ओतूरमधून कांद्याची आवक होत असते. यात सर्वाधिक कांदा नाशिकमधून येतो . नेहमीची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात दररोज सरासरी शंभर गाड्या कांद्याची गरज लागते. मात्र सध्या ही आवक ७० गाड्यांच्या घरात आहे. १५ ते १६ रुपये किलो असलेला कांदा १८ ते १९ रुपये किलोपर्यंत जाऊ लागला आहे. कांद्याच्या बाजारातही पावसाच्या पुराचे पाणी शिरल्याने कांदा पाण्यात अक्षरक्ष: सडला आहे. आता तो कांदा फेकून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे या यापुढे मुंबईला होणारा कांद्याचा पुरवठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
याचप्रमाणे बटाट्याच्याही ७०-८० गाड्या दररोज बाजारात येणे अपेक्षित आहे. सध्या ही आवक सरासरी ६०च्या घरात आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचीही आवक कमी आहे. लसणाच्या चार-पाच गाड्या दररोज येतात. ही आवकही पुरेशी नाही. शिवाय सध्या पावसामुळे बाजारात येणारा माल भिजलेला असतो. तो जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. बटाटा तर बहुतांश खराब झालेला येत आहे. बटाट्याला गाडीतच पाणी सुटत असल्याने तो खराब होत आहे. त्यामुळे बाजारात आल्यावर लगेचच त्याची विक्री करावी लागत आहे.
बटाट्याचे दर ९ ते ११ रुपये किलो झाले आहेत. या पूर्वी कांद्याचे दर १० ते १२ रुपये होते, तर बटाटा ७ ते ८ रुपये किलो होता. लसूण घाऊक बाजारात ५० ते ८० रुपये किलो झाला होता. तो आता ५० ते १०० रुपये किलोपर्यंत आहे. आता सर्वत्र होत असलेला पाऊस पाहता मालाची आवक अशीच होणार आहे. माल भिजून बाजारात येत असल्याने त्यातून व्यापाऱ्यांचे नुकसान अधिक होत आहे. त्यामुळ हा सर्व खर्च काढून व्यापारी मालाची किंमत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसांत मालाचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवली.