मुंबई : सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासह पुन्हा आरक्षणाच्या मागणीचा रेटा लावून धरण्यासाठी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतिदिनी, ९ ऑगस्टला राज्यात जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील समन्वय समितीने गुरा-ढोरांसह रस्त्यावर उतरावे, अशी हाक यानिमित्त देण्यात आली आहे. मुंबईतील सकल मराठा क्रांती मोर्चाने मात्र या आंदोलनाची शहरातील दिशा अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले. मराठा समाजाने राज्य सरकारला २० मागण्यांचे निवेदन यापूर्वी दिलेले आहे. त्यामुळे आता सरकारसोबत चर्चा करण्यात काय हाशील, अशी स्पष्ट भूमिका जिल्हानिहाय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वय समितीने घेतली आहे. सरकारशी चर्चेसाठी गेलेल्या मराठा समाजबांधवांचा आंदोलनाशी संबंध नाही, असेही सोमवारी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आल्याची माहिती समन्वय समितीमधील सूत्रांनी दिली.
९ ऑगस्टला जनआंदोलन
सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासह पुन्हा आरक्षणाच्या मागणीचा रेटा लावून धरण्यासाठी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतिदिनी, ९ ऑगस्टला राज्यात ...
Maharashtra Times 31 Jul 2018, 4:00 am