मुंबई : जलयुक्त शिवार योजना रद्द करण्याबरोबरच फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी करण्याचाही निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या वृक्षलागवडीबाबत शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. हे अभियान राबवणारे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, 'गरज वाटल्यास श्वेतपत्रिकाही काढावी' असे आव्हानही त्यांनी दिले आहे. अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्षलागवडीच्या चौकशीची पहिल्यांदा मागणी केली होती, तेव्हापासूनच या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा केला होता. अभियानावर दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु या अभियानातून अपेक्षित काम झाले नसल्याची शंका महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यक्त केली, तसेच या संदर्भात त्यांनी वनमंत्र्यांना लेखी पत्रेही दिली आहेत. किती वृक्ष किती जगले?...४
वृक्षलागवडीचीही होणार चौकशी
जलयुक्त शिवार योजना रद्द करण्याबरोबरच फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्षलागवडीची चौकशी करण्याचाही निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2020, 4:00 am