मुंबईः राज्यातील सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार हे गुंड आणि भाई लोकांचे सरकार आहे, अशी टीका भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी केली आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून आपल्याला धमक्या येऊ लागल्या आहेत, अशी तक्रार सोमय्या यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडेच अलिकडेच लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा त्यांनी राज्य सरकारवर वरील शब्दांत हल्लाबोल केला आहे. मुंबईत पूर्व उपनगरातील सत्ताधारी पक्षाच्या एका लोकप्रतिनिधीचे निकटवर्तीय आणि त्या भागातील शिवसेना उपविभागप्रमुख यांच्यावर विक्रोळीत गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे.
'हे गुंडांचे सरकार'
मुंबईः राज्यातील सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार हे गुंड आणि भाई लोकांचे सरकार आहे, अशी टीका भाजपचे माजी खा किरीट सोमय्या यांनी केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2019, 4:00 am