म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातर्फे देशभरात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान-३ या विशेष मोहिमेअंतर्गत बेपत्ता झालेल्या अपहृत अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेत असताना, दोन महिन्यांपूर्वी पनवेलच्या पडघे भागातून तसेच नेरुळच्या करावे भागातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांना शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महिनाभरापूर्वी १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार एएचटीयूच्या पथकाने या मुलाचा शोध घेतला असता, तो सानपाडा ते पनवेल रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलमध्ये तसेच कामोठे, पनवेल परिसरातील झोपडपट्टीमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. तो मोठा खांदा भागात फिरताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता, त्याला शाळा शिकणे आवडत नसल्याने त्याने घरातून पलायन केल्याचे तसेच महिनाभरापासून तो सानपाडा ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये फिरून मिळेल ते खाऊन फूटपाथवर रहात असल्याचे सांगितले.
करावे गावातून मेमध्ये १५ वर्षीय मुलगा अशाच पद्धतीने बेपत्ता झाला होता.एएचटीयूच्या पथकाने या मुलाचा शोध घेतला असता, तो गोव्यातील मडगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्यालादेखील गोव्यातून नवी मुंबईत आणले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने त्याची आई मध्यप्रदेश येथे रहात असल्याने तो एकटाच वडिलांसोबत करावे गाव येथे रहात होता. मात्र व्यसनाधीन असलेले वडील त्याच्याकडे लक्ष देत नसल्याने त्याने वडील पूर्वी रहात असलेल्या मडगाव येथे पळून गेल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातर्फे देशभरात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान-३ या विशेष मोहिमेअंतर्गत बेपत्ता झालेल्या अपहृत अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेत असताना, दोन महिन्यांपूर्वी पनवेलच्या पडघे भागातून तसेच नेरुळच्या करावे भागातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांना शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महिनाभरापूर्वी १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार एएचटीयूच्या पथकाने या मुलाचा शोध घेतला असता, तो सानपाडा ते पनवेल रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलमध्ये तसेच कामोठे, पनवेल परिसरातील झोपडपट्टीमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. तो मोठा खांदा भागात फिरताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता, त्याला शाळा शिकणे आवडत नसल्याने त्याने घरातून पलायन केल्याचे तसेच महिनाभरापासून तो सानपाडा ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये फिरून मिळेल ते खाऊन फूटपाथवर रहात असल्याचे सांगितले.
करावे गावातून मेमध्ये १५ वर्षीय मुलगा अशाच पद्धतीने बेपत्ता झाला होता.एएचटीयूच्या पथकाने या मुलाचा शोध घेतला असता, तो गोव्यातील मडगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या मुलाचा शोध घेऊन त्यालादेखील गोव्यातून नवी मुंबईत आणले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने त्याची आई मध्यप्रदेश येथे रहात असल्याने तो एकटाच वडिलांसोबत करावे गाव येथे रहात होता. मात्र व्यसनाधीन असलेले वडील त्याच्याकडे लक्ष देत नसल्याने त्याने वडील पूर्वी रहात असलेल्या मडगाव येथे पळून गेल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.