कल्याण : मुंबईतून खडवली येथील भातसा नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले कृष्णा (वैभव) धरणे (१७) आणि अक्षय भरमे (२१) हे दोन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. वडाळा परिसरातील अकराजण सहलीसाठी भातसा नदीजवळ आले होते. त्यांच्यात या दोघांचा समावेश होता. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान हे स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत या दोघांचा शोध घेत होते.
भातसा नदीत दोन विद्यार्थी बुडाले
मुंबईतून खडवली येथील भातसा नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले कृष्णा (वैभव) धरणे (१७) आणि अक्षय भरमे (२१) हे दोन विद्यार्थी बुडाल्याची घटना ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 4:00 am