मुंबई: करोना संकटात रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने पालिकेच्या रुग्णवाहिन्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पालिकेने आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या १००वरून ४५०वर नेली असून, त्या अॅपवर उपलब्ध करून देण्यासाठी 'उबर' कंपनीची मदत घेतली जाणार आहे. पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. या वाढीव रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन संगणकीकृत प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 'उबर'च्या धर्तीवर अॅप तयार केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रुग्णवाहिकांसाठी ‘उबर’
करोना संकटात रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने पालिकेच्या रुग्णवाहिन्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2020, 4:00 am