म. टा. प्रतिनिधी, जालना जातीची उतरंड आजही जशास तशीच आहे. सत्तेच्या दलालांनी फुले-शाहू-आंबेडकर कळूच दिले नाहीत. आजही ही मंडळी आपला वापर केवळ त्यांच्या सत्तेसाठीच वापरून घेत आहेत. त्यासाठी जागे व्हा! डॉ. आंबेडकरांना अपेक्षीत लोकशाही का रुजली नाही? तर आजही आम्ही खऱ्याअर्थाने जागे झालेलो नाहीत. म्हणूनच जागे व्हावा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा हक्क इमाने-इतबारे बजावा. आपले मत म्हणजे चोवीस कॅरेट सोने आहे, ते विकू नका, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफतांना मिटकरी बोलत होते. यावेळी अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, गोदावरी विकास महामंडळाचे अध्यक्ष भास्कर अंबेकर, पल्लवी जाधव, सुधाकर रत्नपारखे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. कालिदास सूर्यवंशी यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार सुकन्या हेरकर हिने मानले.
'मतदानाचा हक्क इमाने-इतबारे बजावा'
म टा प्रतिनिधी, जालना जातीची उतरंड आजही जशास तशीच आहे सत्तेच्या दलालांनी फुले-शाहू-आंबेडकर कळूच दिले नाहीत...
MT 11 Apr 2019, 4:00 am