अ‍ॅपशहर

शहापूरचा पाणीप्रश्न कायम

शहापूरच्या पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहापूर ते मुंबई अशी जलदिंडी भाजपचे ठाणे विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी १३ ते १७ मे दरम्यान काढण्यात आली होती. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्यात आली. एका महिन्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वसन त्यांनी दिले. याला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Times 19 May 2017, 3:00 am
मुख्यमंत्र्यांना आश्वासनांचे करून दिले स्मरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water issue not solve of shahapur
शहापूरचा पाणीप्रश्न कायम


म. टा. वृत्तसेवा, शहापूर

शहापूरच्या पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहापूर ते मुंबई अशी जलदिंडी भाजपचे ठाणे विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी १३ ते १७ मे दरम्यान काढण्यात आली होती. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्यात आली. एका महिन्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वसन त्यांनी दिले. याला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

शहापूर तालुका मुंबई महानगरपालिकेने दत्तक घ्यावा. तसेच तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा या धरणांतून मुंबईला पाणी दिले जाते, तेच पाणी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना द्यावे. ज्या पाणीयोजना रखडल्या आहेत, त्यांच्यात भ्रष्टाचार झाला का, याची चौकशी व्हावी, अशा मागणी जलदिंडीद्वारे करण्यात आल्या होत्या. त्याचे शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना स्मरण करून दिले. याला एक वर्ष उलटले तरी याप्रश्नी बैठक घेण्यात आली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बावली धरणाचे पाणी शहापूरला आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला इगतपुरी तालुक्यातूनच विरोध आहे. कारण त्यांचे पाणी देण्याचा विचारच चुकीचा आहे. तेथे पाण्याचे दुर्भिक्ष असताना ते पाणी तालुक्याला देणे योग्य होणार नाही. आमच्या जवळचे धरण सोडून तेथून पाणी आणण्याचा अट्टहास का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पाण्यासाठी आणखी किती जणांचे बळी जाणार आहेत. बावलीचे धरण बांधण्यास खूप अडचणी आहेत. त्यात बरेच वर्ष जातील. तोपर्यंत आम्ही अशीच पाण्यासाठी वणवण करायची का, असे काही प्रश्नही त्यांनी या पत्राद्वारे उपस्थित केले आहेत. लवकरात लवकर भातसा, तानसा, वैतरणा या धरणातून पाणी द्यावे. भाजप पक्षाचा एक पदाधिकारी आहे तरीदेखील दखल घेतली गेली नाही, तर दुसऱ्या सामान्य माणसाची काय गत असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज