मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव तुडुंब भरले असले तरी मुंबईकरांच्या पाचवीला पाणी टंचाई पुजलेलीच आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे मुंबईच्या अनेक भागात पुरेसे पाणीच येत नसल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीत करण्यात आला. नेमकी पाणी टंचाई कशामुळे होते आहे, याची माहिती प्रशासनाने समितीत सादर करावी, असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला मात्र प्रशासनाने त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही. परिणामी उत्तर येईपर्यंत नगरसेवकांनी उपस्थित केलेला मुद्दा राखून ठेवला.
मुंबईत पाणीटंचाई
मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव तुडुंब भरले असले तरी मुंबईकरांच्या पाचवीला पाणी टंचाई पुजलेलीच आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Nov 2019, 4:00 am