मटा ऑनलाइन वृत्त । नवी मुंबई
'महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून सर्वस्वी आमची जबाबदारी आहे,' असं सांगतानाच, 'सावित्री नदीवरील दुर्घटनाग्रस्त पूल अवघ्या १८० दिवसांत पुन्हा बांधून देऊ,' अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाड दुर्घटनेवरून विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला घेरले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. संसदेतही या दुर्घटनेचे पडसाद उमटले होते. नितीन गडकरी यांनी आज दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोप-प्रत्यारोपाच्या या राजकारणावर पडदा टाकला. 'महाड येथील पुलाच्या कामासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. या कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून सहा महिन्यांत नवा पूल उभा करू,' असं गडकरी यावेळी म्हणाले.
डिसेंबरपासून चौपदरीकरण
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या डिसेंबरपासून सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही गडकरी यांनी केली. 'आघाडी सरकारच्या काळात या मार्गावरील भू-संपादनाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीनं सुरू होती. ही प्रक्रिया वेगानं पार पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला असून येत्या दोन वर्षांत हा महामार्ग चौपदरी करू,' असं गडकरी म्हणाले. 'लोकांनीही आवश्यक तिथं आम्हाला सहकार्य करावं,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
'महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून सर्वस्वी आमची जबाबदारी आहे,' असं सांगतानाच, 'सावित्री नदीवरील दुर्घटनाग्रस्त पूल अवघ्या १८० दिवसांत पुन्हा बांधून देऊ,' अशी ग्वाही केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाड दुर्घटनेवरून विधीमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला घेरले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. संसदेतही या दुर्घटनेचे पडसाद उमटले होते. नितीन गडकरी यांनी आज दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोप-प्रत्यारोपाच्या या राजकारणावर पडदा टाकला. 'महाड येथील पुलाच्या कामासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. या कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून सहा महिन्यांत नवा पूल उभा करू,' असं गडकरी यावेळी म्हणाले.
डिसेंबरपासून चौपदरीकरण
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या डिसेंबरपासून सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही गडकरी यांनी केली. 'आघाडी सरकारच्या काळात या मार्गावरील भू-संपादनाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीनं सुरू होती. ही प्रक्रिया वेगानं पार पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला असून येत्या दोन वर्षांत हा महामार्ग चौपदरी करू,' असं गडकरी म्हणाले. 'लोकांनीही आवश्यक तिथं आम्हाला सहकार्य करावं,' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.