अ‍ॅपशहर

मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद' उपक्रम, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील बुथ येथे उद्योग, व्यवसाय हा उपक्रम भाजपच्या वतीने राबविण्यात येतोय.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 11 Jan 2022, 11:00 pm
उस्मानाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील बुथ येथे उद्योग, व्यवसाय हा उपक्रम भाजपच्या वतीने राबविण्यात येतोय. या ‘आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. आजपर्यंत १४१ नव उद्योजकांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या मान्यतेसह बँकेकडे दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pm modi And ranajagjitsigh patil
पंतप्रधान मोदी आणि राणा जगजितसिंह पाटील


आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर यांच्या सहकार्याने जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये पंतप्रधान-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि उद्योगासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्याने स्वःताची गुंतवणुक ५% ते १०% करायची असून १५% ते ३५% पर्यंत अनुदान मिळणार आहे. ५० लाख रुपये पर्यंतचे प्रकल्प या उपक्रमाअंतर्गत सुरु करता येत असून त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ८ वी पास असण्याची आहे. १० लाख रुपये पर्यंत विनातारण कर्जाची सोय या उपक्रमाअंतर्गत आहे. यामध्ये लहान-मोठे १५० पेक्षा जास्त उद्योग आहेत. या उपक्रमात ४६० पेक्षा जास्त प्रस्ताव दाखल झाले आहेत.

भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला उस्मानाबाद जिल्हयातून चांगला प्रतिसाद मिळतोय. यामध्ये अर्ज केलेले दाळ उद्योग, लाकडी तेल घाणा, सुगंधित तेल उत्पादन, अगरबत्ती उत्पादन, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, फॅब्रिकेशन, मत्स्य पालन, दुग्ध प्रक्रिया उद्योग, खवा उद्योग व इतर उद्योगांची नोंदणी झाली आहे.

आजपर्यंत ४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद झाली असुन २४० प्रस्ताव उस्मानाबाद जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी १४१ प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजुर करुन बँकेकडे पाठविण्यात आले आहेत तर त्याचा पाठपुरावा चालु आहे.

आपल्या आवडीचा उद्योग, व्यवसाय सुरु करुन जिल्हयातील युवक आत्मनिर्भर व्हावा व याच माध्यमातून आपला उस्मानाबाद जिल्हा आत्मनिर्भर व्हावा, असा राणाजगजितसिंह पाटील यांचा मानस आहे. या उपक्रमाचे यश पाहून जिल्हातील अधिकाधिक युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज