अ‍ॅपशहर

Cambodia Fraud : नोकरीच्या आमिषाने कंबोडियात जाऊन अडकला; उस्मानाबादच्या तरुणाची थरारक सुटका

Cambodia Fraud : अनेक भारतीय कंबोडियामध्ये सायबर गुलामगिरीचे शिकार झाल्याचं उघडं झालं आहे. उस्मानाबादमधील एका तरुणाने या गुलामगिरीतून सात जणांची सुटका केली आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2022, 7:59 pm
उस्मानाबाद : परदेशात नोकरीला जाताय थोड थांबा परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळतेय म्हणून उस्मानाबाद येथील कबीर शेख हल्ली राहणार पुणे हा तैवान येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला तरुण चायनिज भाषा येत असल्यामुळे चांगल्या पगाराची नोकरीची ऑफर आल्यामुळे कंबोडिया येथे गेला. तेथे त्याच्यासोबत एक भयानक प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Cambodia Fraud


उस्मानाबादच्या खासगी महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर कबीर २०१४ साली तैवानला गेला. तैवानला पदव्युत्तर शिक्षण घेतले. कबीरला चिनी भाषा बोलता येत असल्यामुळे त्याला कंबोडियात सायबर सेक्युरिटी तज्ज्ञ म्हणून काम करण्याची ऑफर आली. त्याला तिथे पाच हजार डॉलर पगार मिळणार होता. कबीर पु्ण्याहून बेंगळूरु, बेंगळूरु ते बॅंकॉक आणि मग बॅंकॉकहून कंबोडिया असा प्रवास करत तो या कंपनीत पोहोचला. याआधी कबीर पुण्यातल्या एका आयटी कंपनीत आर्थिक सिक्युरिटीज विश्लेषक म्हणून कार्यरत होता. कबीरसोबत सात भारतीय होते. यामध्ये एक मुलगी होती. सात जण कंपनीच्या आवारात पोहोचले. कबीरने आतमधल दृष्य पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचं कबीरला दिसलं.

फडणवीसांना भाजप उपाध्यक्षांचा दणका, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन
या ऑनलाईन फ्रॉड कंपनीच्या बाबत स्थानिक पोलिसांना फोन केला किंवा कामास नकार दिला तर तरुणांचा अमानुष छळ करत, अमानुषपणे मारहाण करत, विदयुत करंट देत, अवयव काढणाऱ्या टोळी विकत. दिवसाला हि कंपनी १० कोटी पेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन पध्दतीने लुटतात केवळ तेथील सरकारचे अप्रत्यक्ष सहकार्य असल्यामुळे असंख्य टोळी तेथे सक्रिय आहेत.

शादी डॉटकॉम, जीवनसाथी डॉटकॉम, या विवाह सूचक संकेत स्थळावरिल मुलींचे सुंदर फोटो घ्यायचे आणि मुलींच्या नावे प्रोफाईल बनवायचे आणि भारतातील तसेच युएस, युक्रेन, व्हियतनाम आदी येथील श्रीमंत मुलांना संपर्क करायचा आणि जवळीक करायची. एकाच वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन २०० ते ३०० तरुणांना संपर्क केला जातो. सुंदर मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरुन डाऊनलोड करुन घ्यायचे ते फोटो प्रोफाईलवर जोडायचे. भारतीयांसोबत चॅटींग करायची. असं काम तिथे चालतं.

८ दिवसांच्या भयंकर अनुभवानंतर सुदैवाने कबीर आणि इतर सात भारतीयांची सुटका झाली आहे. कबीर शेखच्या लक्षता आले की आपण फसलोय तेव्हा त्याने तेथील भारतीय दुतावासाला संपर्क केला. दोन तासानंतर स्थानिक पोलीस आणि दुतावासाचे अधिकारी यांनी कबीर सह ६ भारतीय तरुणांना सोडवलं आणि भारतात पाठवलं. कबीर शेख हा ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या काळात कंबोडिया या देशात होता.

अजूनही १५ भारतीय मुले-मुली कंबोडियात अडकली आहेत. भयंकर यातना सहन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तरुणांना फसवणारे काही एजंट बिहार, बंगालमध्ये काम करत आहेत. कंबोडियातूनही मुलांना फसवून भारतात आणून त्यांच्याकडून हेच काम इथे करुन घेतलं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज