उस्मानाबाद : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाआरोग्य शिबीर पार होत आहे. रविवारी (दि.२७) पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. परंडा-भूम-वाशी तालुक्यासह परिसरातील हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली.
परंडा शहरातील कोटला मैदानावर रविवारी व सोमवार सलग दोन दिवस शिबीर झाले. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत, शिबिराचे मुख्य डॉ. धर्मेद्रा, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओबांसे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, सावंत परिवारातील सदस्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, तालुक्यातील आरोग्य अधिकारी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवदर्शनासाठी तुळजापूरकडे येताना दुचाकीला एसटी बसची धडक; महिला आणि युवकाचा जागीच मृत्यू
मोफत आरोग्य तपासणी असल्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिराला गर्दी केली होती. अचानक रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. चेंगराचेंगरी झाली असून ४ वयस्कर महिला आणि ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अफवा यावेळी कोणीतरी पसरवली. यामुळे एकच गोंधळ झाला. या गोंधळामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. पण प्रशासनाने वेळीच दक्षता घेतल्यामुळे ही दुर्घटना टळली, असं सांगितलं जातंय. तर चेंगराचेंगरी सारखी कुठली ही घटना झाली नसल्याचं पोलीस प्रशासन सांगितलं.
महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच औषधाचे वाटप करण्यात आले. शिबिरात कॅन्सर, नेत्र, हृदयरोग, कान- नाक घसा, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, इसीजी, दंत तपासणी, रक्तगट तपासणी, चष्म्याचे वितरण करण्यात आले. शिबिरासाठी २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, आवश्यक मनुष्यबळ, रुग्णवाहिका, ४ अग्निशामक बंब, पिण्याच्या पाण्याची सोय, भोजनाची व्यवस्था, २४ तास विजेची व्यवस्था करण्यात आली होती.
परंडा शहरातील कोटला मैदानावर रविवारी व सोमवार सलग दोन दिवस शिबीर झाले. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत, शिबिराचे मुख्य डॉ. धर्मेद्रा, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओबांसे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, सावंत परिवारातील सदस्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, तालुक्यातील आरोग्य अधिकारी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवदर्शनासाठी तुळजापूरकडे येताना दुचाकीला एसटी बसची धडक; महिला आणि युवकाचा जागीच मृत्यू
मोफत आरोग्य तपासणी असल्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिराला गर्दी केली होती. अचानक रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. चेंगराचेंगरी झाली असून ४ वयस्कर महिला आणि ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अफवा यावेळी कोणीतरी पसरवली. यामुळे एकच गोंधळ झाला. या गोंधळामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. पण प्रशासनाने वेळीच दक्षता घेतल्यामुळे ही दुर्घटना टळली, असं सांगितलं जातंय. तर चेंगराचेंगरी सारखी कुठली ही घटना झाली नसल्याचं पोलीस प्रशासन सांगितलं.
महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच औषधाचे वाटप करण्यात आले. शिबिरात कॅन्सर, नेत्र, हृदयरोग, कान- नाक घसा, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, इसीजी, दंत तपासणी, रक्तगट तपासणी, चष्म्याचे वितरण करण्यात आले. शिबिरासाठी २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, आवश्यक मनुष्यबळ, रुग्णवाहिका, ४ अग्निशामक बंब, पिण्याच्या पाण्याची सोय, भोजनाची व्यवस्था, २४ तास विजेची व्यवस्था करण्यात आली होती.