अ‍ॅपशहर

कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या अनाथ मुलांना सरकारकडून मिळणार १५ लाख रुपये!

अनाथ मुलांना केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून १० लाख रुपये मिळणार आहेत तर राज्य सरकारच्या मदत व पुर्नवसन विभागाकडून ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. असे एकूण १५ लाख रुपये या अनाथ बालकांना मिळणार आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 5 Jan 2022, 6:04 pm
रहिम शेख, उस्मानाबाद : कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या उस्मानाबाद जिल्ह्यात हजारांच्या घरात आहे. त्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाने मुलांचे आई वडिल मयत झालेल्या अनाथ मुलांची संख्या १४ एवढी आहे. या अनाथ मुलांना केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडून १० लाख रुपये मिळणार आहेत तर राज्य सरकारच्या मदत व पुर्नवसन विभागाकडून ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. असे एकूण १५ लाख रुपये या अनाथ बालकांना मिळणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम union And State Government help 15 lakh rupees for children who lost their parents due to covid 19


२ कोटी १० लाख रुपये जिल्हाधिकारी व पाल्य यांच्या संयुक्त खात्यावर ही रक्कम पुढील आठवड्यात जमा होणार आहे. त्यामुळे आई वडिलांच्या जाण्यानंतर भविष्य अंधारात असलेल्या बालकांना सरकारच्या मदतीनंतर आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील २०८३ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या वारसांना राज्य सरकारच्या मदत व पुर्नवसन विभागाकडून ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यातून फक्त ७३७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. उर्वरित वारसांनी अद्यापपर्यंत आपले प्रस्ताव/ अर्ज दाखल केले नाहीत.

जिल्हा प्रशासनाने २० डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत वारसांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले होते. परंतु वारसांनी या आवाहनाकडे गांभिर्याने लक्ष दिले नसल्याचे दिसतंय. उर्वरित वारसांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.

कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची योजना

दरम्यान, कोरोनाने आई वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मागील काळात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मुलांच्या भवितव्यासाठी काय करता येईल?, याविषयी या बैठकीत दीर्घ चर्चा झाली. यानुसार चर्चेअंती, कोविडचा फटका बसलेल्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारने घेतली आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन (PM CARES For Children) ही कोविड बाधित मुलांना आधार मिळण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरु करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज