उस्मानाबाद : मराठवाड्यात सतत पडणारा दुष्काळ आता मात्र संपला पाहिजे. याच दुष्काळातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी २००४ मध्ये कृष्णा - गोदावरी नदीमधील अतिरिक्त पाणी देता येतं का ? याबाबत समिती गठित करण्यात आली. या समितीचा अहवाल आणि तांत्रिक परवानगी पाणी वाटप लवाद करार हे सोपस्कार पार पाडून २००९ मध्ये तत्कालीन सरकारने कृष्णा खोरे - गोदावरी खोरे मधील ११५ टिएमसी पाण्यापैकी २१ टिएमसी पाणी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आले. सदरील कामासाठी ४८४५.०५ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला.
२१ टिएमसी पाण्यापैकी १९ टिएमसी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी तर २ टिएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ टिएमसी तर उर्वरित १४ टिएमसी पाणी उपलब्ध झाल्यानंतर द्यायचे. उस्मानाबाद जिल्ह्याला ७ टिएमसी पाणी २ टप्प्यात देण्याचे ठरले आहे. तर तिसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्याला पाणी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती येथून निरा नदीवरुन पाणी भिमा - निरा स्थिरिकरण योजने अंतर्गत उजणी जलाशयात सोडायचे जेवुर येथील बोगदाद्वारे परंडा तालुक्यातील सिना - कोळेगाव धरणात सोडायचे. सिना - कोळेगाव धरणातील पाणी कालव्याद्वारे भुम, परंडा , वाशी , कळंब , उस्मानाबाद या तालुक्यात ३.०८ टिएमसी पाणी द्यायचे तर दुसऱ्या टप्प्यात घाटणे येथून कॅनेलद्वारे तुळजापुर तालुक्यातील रामदरा तलावात पाणी सोडायचे. तुळजापुर, लोहारा, उमरगा या तालुक्यात २.२४ टिएमसी मिळणार आहे.
दरम्यान, ११ वर्षात ६०% काम झाले असून जवळपास २ हजार कोटी रुपये या कामासाठी खर्च झाला आहे. संथ गतिने काम होत असल्यामुळे २०२५ पर्यंत कृष्णेचे पाणी मराठवाड्याला मिळणे शक्य नाही शिवाय कामाचा खर्च देखील वाढला आहे, त्याची प्रशासकिय मान्यता मिळेपर्यंत किती वेळ जाईल हे सांगता येत नाही. मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळणार कधी? यासाठी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.
२१ टिएमसी पाण्यापैकी १९ टिएमसी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी तर २ टिएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ टिएमसी तर उर्वरित १४ टिएमसी पाणी उपलब्ध झाल्यानंतर द्यायचे. उस्मानाबाद जिल्ह्याला ७ टिएमसी पाणी २ टप्प्यात देण्याचे ठरले आहे. तर तिसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्याला पाणी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती येथून निरा नदीवरुन पाणी भिमा - निरा स्थिरिकरण योजने अंतर्गत उजणी जलाशयात सोडायचे जेवुर येथील बोगदाद्वारे परंडा तालुक्यातील सिना - कोळेगाव धरणात सोडायचे. सिना - कोळेगाव धरणातील पाणी कालव्याद्वारे भुम, परंडा , वाशी , कळंब , उस्मानाबाद या तालुक्यात ३.०८ टिएमसी पाणी द्यायचे तर दुसऱ्या टप्प्यात घाटणे येथून कॅनेलद्वारे तुळजापुर तालुक्यातील रामदरा तलावात पाणी सोडायचे. तुळजापुर, लोहारा, उमरगा या तालुक्यात २.२४ टिएमसी मिळणार आहे.
दरम्यान, ११ वर्षात ६०% काम झाले असून जवळपास २ हजार कोटी रुपये या कामासाठी खर्च झाला आहे. संथ गतिने काम होत असल्यामुळे २०२५ पर्यंत कृष्णेचे पाणी मराठवाड्याला मिळणे शक्य नाही शिवाय कामाचा खर्च देखील वाढला आहे, त्याची प्रशासकिय मान्यता मिळेपर्यंत किती वेळ जाईल हे सांगता येत नाही. मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळणार कधी? यासाठी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.