म. टा. वृत्तसेवा, पालघर
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र भेसळयुक्त खते, बनावट बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक कोण करत असेल, तर अशा गैरप्रकारांबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे कृषिमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विविध कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
वसई भागातील फुलशेतीप्रमाणे डहाणू, विक्रमगड, वाडा भागातही या पिकांखालील क्षेत्रात वाढ करावी. केवळ शेतकऱ्यांचे प्रयत्न उपयोगी नाहीत, तर कृषी विभागानेही विशेष प्रयत्न करावेत. मुंबई शहर जवळ असल्याने मोठा वाव आहे. रब्बी हंगामातील पिकाखालील क्षेत्रात वाढ करावी. दुबार पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, भाजीपाला, फुलशेती, सुगंधी वनस्पती यांनाही वाव आहे. मोकाट जनावरांच्या प्रश्नी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे, कंद व मुळवर्गीय पिकांचा प्रयोग जिल्हा कृषी विभागाने करावा, अशा सूचना दादाजी भुसे यांनी दिल्या
जिल्ह्यांत ठिबक व तुषार सिंचनाची प्रगती संथ आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत विहिरींच्या कार्यक्रमांना या उपक्रमासाठी जोड द्यावी, जेणेकरून ओलीताखालील क्षेत्र वाढेल. रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा पिके घेण्याचा कल वाढेल. जिल्ह्यात लिची लागवडीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. रब्बीमध्ये हरभरा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे असे निर्देशही पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले.
पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण २४ हजार ९६४ शेतकऱ्यांनी १२ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला असून २०८ शेतकऱ्यांना २३.९१ लाख रुपयांचे विमा अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत चिकू, आंबा, काजू व केळी पिकवणाऱ्या २८३ शेतकऱ्यांनी १९० हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदविला असून २८३ शेतकऱ्यांना ५६.११लाख रुपयांचे विमा अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
महिला शेतकरी सन्मान वर्ष
'विकेल ते पिकेल' योजनेंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानाअंतर्गत २७४ शेतकरी ग्राहक विक्री स्थळे सध्या चालू आहेत. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करावयाचे आहे, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र भेसळयुक्त खते, बनावट बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक कोण करत असेल, तर अशा गैरप्रकारांबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे कृषिमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विविध कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
वसई भागातील फुलशेतीप्रमाणे डहाणू, विक्रमगड, वाडा भागातही या पिकांखालील क्षेत्रात वाढ करावी. केवळ शेतकऱ्यांचे प्रयत्न उपयोगी नाहीत, तर कृषी विभागानेही विशेष प्रयत्न करावेत. मुंबई शहर जवळ असल्याने मोठा वाव आहे. रब्बी हंगामातील पिकाखालील क्षेत्रात वाढ करावी. दुबार पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, भाजीपाला, फुलशेती, सुगंधी वनस्पती यांनाही वाव आहे. मोकाट जनावरांच्या प्रश्नी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे, कंद व मुळवर्गीय पिकांचा प्रयोग जिल्हा कृषी विभागाने करावा, अशा सूचना दादाजी भुसे यांनी दिल्या
जिल्ह्यांत ठिबक व तुषार सिंचनाची प्रगती संथ आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत विहिरींच्या कार्यक्रमांना या उपक्रमासाठी जोड द्यावी, जेणेकरून ओलीताखालील क्षेत्र वाढेल. रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा पिके घेण्याचा कल वाढेल. जिल्ह्यात लिची लागवडीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. रब्बीमध्ये हरभरा घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे असे निर्देशही पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले.
पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण २४ हजार ९६४ शेतकऱ्यांनी १२ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदवला असून २०८ शेतकऱ्यांना २३.९१ लाख रुपयांचे विमा अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत चिकू, आंबा, काजू व केळी पिकवणाऱ्या २८३ शेतकऱ्यांनी १९० हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदविला असून २८३ शेतकऱ्यांना ५६.११लाख रुपयांचे विमा अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
महिला शेतकरी सन्मान वर्ष
'विकेल ते पिकेल' योजनेंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानाअंतर्गत २७४ शेतकरी ग्राहक विक्री स्थळे सध्या चालू आहेत. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करावयाचे आहे, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.