अ‍ॅपशहर

वाहन आणि चालकाने नव्हे तर 'या' रस्त्याने घेतले ११३ जणांचे बळी..!

कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६१ रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी १३ नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. साहुने यांना पत्र दिले आहे.

Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2022, 12:13 pm
परभणी : कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील रस्त्याचे काम गेल्या ५ वर्षांपासून पूर्ण करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे सन २०१७ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग ६१ वर २१८ अपघात झाले असून त्यामध्ये तब्बल ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सहूत्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Parbhani News
वाहन आणि चालकाने नव्हे तर 'या' रस्त्याने घेतले ११३ जणांचे बळी..!


काय म्हटले आहे पत्रात...

कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६१ रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे जनतेमध्येही मोठी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी १३ नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सहूत्रे यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग ६१ वर २१८ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. असा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. परिणामी काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी. महामार्गावरील अर्धवट काम ७ जून तुम्ही पूर्ण करावे. काम पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पत्रात जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी म्हटले आहे.

मुंबईत तुमची ताकद नाही, म्हणूनच कोणालातरी पकडून...; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?
अन्य रस्त्यांबाबतही अशीच भूमिका राहणार का?

जिल्हाधिकारी गोयल यांनी झिरोफाटा ते कोल्हा या रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत आता कठोर भूमिका घेतली असली, तरी जिल्ह्यातील इतर प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबतही त्या अशीच भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण परभणी गंगाखेड, परभणी - जिंतूर या मुख्य रस्त्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण झालेले नाही.
लेखकाबद्दल
प्रशांत पाटील
प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज