अ‍ॅपशहर

८ महिन्याच्या लेकराला केलं पोरकं, २२ वर्षीय महिलेची आत्महत्या, का उचललं टोकाचं पाऊल?

Parbhani News: परभणीत विवाहित महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून तिने ही टोकाची भूमिका घेतली, पण यामुळे अवघ्या ८ महिन्याचा मुलगा पोरका झाला आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2022, 3:45 pm
परभणी : शेतात विहीर खोदण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करीत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या सगळ्याला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील केकरजवळा इथं घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parbhani news


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ११ जुन रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा घडली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या अमोल लाडाने असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! महिलेवर बसमध्ये बलात्कार, दोन ठिकाणी थांबला आणि....
जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील नारायण ढोणे यांची मुलगी संध्या हीचा मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील अमोल रघुनाथ लाडाणे याच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखाने नांदवल्यानंतर पती अमोल भगवान लाडाणे, भाया विठ्ठल भगवान लाडाणे, जाऊ कविता विठ्ठल लाडाणे यांनी शेतात विहीर खोदण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत संध्या हिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

याबाबत संध्याने वडील नारायण ढोणे यांना सांगितले. वडील नारायण ढोणे यांनी सध्या आपल्याकडे पैसे नसून पैसे आल्यावर तुम्हाला देतो असे सांगितले. यानंतर सासरच्या लोकांनी संध्याला अधिक त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मयत संध्या हीचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला.

प्रियकराचा अचानक झाला मृत्यू; नैराश्यातील तरुणीने गोदावरीत उडी घेत संपवलं जीवन
संध्याचे वडील नारायण ढोणे यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड हे करीत आहेत. दरम्यान, आरोपीला अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याची भूमिका सासरच्या लोकांनी घेतल्याने रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत अंत्यविधी करण्यात आला नव्हता. केकरजवळा येथे तणाव निर्माण झाल्याने मोठ्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मयत संध्या हिला आठ महिन्याचा मुलगा असून या प्रकरणाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज