अ‍ॅपशहर

मुख्यमंत्रीसाहेब... आम्हाला फक्त एक पूल हवा... तरच खरे स्वातंत्र्य! ... पाहा स्थिती

Maharashtra News : शिक्षण, आरोग्या आणि विकासासाठी फक्त हवा एक पूल... ही मागणी आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील एका गावाची. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर परभणीतील नागरिकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2022, 2:15 pm
परभणी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर पूल बांधलेला नसल्याने पावसाळ्यात येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून दोरीच्या सहाय्याने ओढा पार करत शाळा गाठावी लागत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jintur parbhani news
मुख्यमंत्रीसाहेब... आम्हाला फक्त एक पूल हवा... तरच खरे स्वातंत्र्य! ... पाहा स्थिती


जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथून चितनरवाडी हे गाव दोन किलो मीटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या ३५० एवढी आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापपर्यंत या गावाला पक्का रस्ता नाही. गावाच्या वेशिवरच ओढा असून या ओढ्याला बारमाही पाणी असते. पावसाळ्यात तर हा ओढा भरून वाहतो. हा ओढा पार करण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही. या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आडगाव किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तसेच गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू, खते, बी-बियाणे खरेदीसाठी, रुग्णालयासाठी आडगाव किंवा जिंतूरजवळ करावे लागते. पावसाळ्यात या ओढ्याला भरपूर पाणी असल्याने गावात दुचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी वाहने जाऊ शकत नाहीत.

माणुसकी संपली! रात्री चालताना बाईकने उडवलं, मदत न करतात पळाला; कोणीही नाही बघितलं

पावसाळ्यात अत्यावस्थ रुग्णास अथवा गर्भवती मातेला रुग्णालयात न्यायचे असल्यास गावात रुग्णवाहिका अथवा तत्सम वाहन येत नसल्याने गावकरी संबंधित रुग्णास पाठीवर बांधून, बांबूच्या सहाय्याने झोळणी करून किंवा बाजेवर झोपवून आडगाव गाठतात. पावसाळ्यात संततधार पाऊस पडत असल्यास गावकऱ्यांच्या समस्येत आणखीनच भर पडते. ओढ्याच्या काठाला बांधलेल्या दोरीच्या साह्याने नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून कमरेइतक्या पाण्यातून ओढा पार करावा लागतो. या ओढ्यावर पूल बांधावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. पण ७५ वर्षांनंतरही पूल काही बांधला गेलेला नाही.

शेतकऱ्यांनी केला गाडीचा पाठलाग... अधिक चौकशी केली अन् संशय खरा ठरला, पाहा काय घडलं

महत्वाचे लेख