अ‍ॅपशहर

काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची चर्चा; कृषिमंत्र्यांच्या बैठकीचे फोटो व्हायरल

Abdul Sattar: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणीत अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत बैठक घेतली. या बैठकीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2022, 5:51 pm
परभणी : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल परभणीमध्ये दुष्काळ पाणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये चक्क त्यांनी काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. बैठकीमध्ये ठेवलेल्या काजू आणि बदामाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा दुष्काळ पाहणी दौरा हा केवळ स्टंटबाजी होता का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Abdul Sattar


राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे काल परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी जिंतूर तालुक्यातील मालेगाव आणि परभणी तालुक्यातील असोला येथे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. यासोबतच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेती पिकांच्या नुकसानीची तीव्रता जाणून घेण्यासाठी आढावा बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

वाचा- PAK vs ZIM: पाकिस्तानचा संघ क्वॉलिफाय झाला; झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर पाहा झालं तरी काय

सदरील बैठकीमध्ये प्रशासनाकडून कृषी मंत्र्यांसाठी चक्क काजू बदामाची व्यवस्था करण्यात आली होती. कृषिमंत्र्यांनी देखील काजू बदाम खातच परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.

वाचा- विराटचे थेट सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाला चॅलेंज, कोणी विचार देखील केला नव्हता

एकीकडे परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी साजरी झाली आहे. अशातच कृषीमंत्र्यांनी काजू बदाम खात नुकसानीचा आढावा घेतला असल्याने आता शेतकऱ्यांना मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर बैठकीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता कृषीमंत्र्यांचा परभणी जिल्हा दौरा हा केवळ स्टंटबाजी होता का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज