परभणी : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून राज्यासह परभणी जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे आहे. एकाच दिवसात तब्बल 111 मिलिमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली असून 1 जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाने जिल्ह्यातील मानवत तालुक्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दुधना नदीकाठी असलेल्या सावंगी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्तावरील ओढ्याचे पाणी पुलावरून जात आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना गावात प्रवेश करता येत नसून कमरेएवढ्या पाण्यातून पायी जावे लागत आहे.
तर सेलु तालुक्यातील कुपटा गावचा संपर्क ही काल दुपारी 4 वाजल्यापासून तुटलेला आहे. पालम तालुक्यातील 14 गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यात सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने लोअर दुधनाच्या चार दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. काल रात्री 8 वाजता निम्न दूधना प्रकल्पातून चार दरवाज्यातून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे अवाहन पूर नियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
सततचा पाऊस त्यात प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांच्या समस्या वाढले आहे हवामान विभागाने वर्तविला अंदाजानुसार आणखीन दोन दिवस जिल्ह्यात पाऊस सुरूच राहणार आहे त्यामुळे येणारे दिवस ही जिल्हावासीयांना संकटाचे जाणार आहे.
तर सेलु तालुक्यातील कुपटा गावचा संपर्क ही काल दुपारी 4 वाजल्यापासून तुटलेला आहे. पालम तालुक्यातील 14 गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यात सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने लोअर दुधनाच्या चार दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. काल रात्री 8 वाजता निम्न दूधना प्रकल्पातून चार दरवाज्यातून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे अवाहन पूर नियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
सततचा पाऊस त्यात प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात नागरिकांच्या समस्या वाढले आहे हवामान विभागाने वर्तविला अंदाजानुसार आणखीन दोन दिवस जिल्ह्यात पाऊस सुरूच राहणार आहे त्यामुळे येणारे दिवस ही जिल्हावासीयांना संकटाचे जाणार आहे.