अ‍ॅपशहर

कुटुंबात नऊ जण, कर्त्या पुरुषाने उचललं टोकाचं पाऊल, घरासमोरच स्वतःला संपवलं, गाव हळहळलं

Parbhani News : राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गहू, कांदा आणि द्राक्षासह इतर फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मागे आता बँका आणि फायनान्स कंपन्यांचा तगादा लावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2023, 2:11 pm
परभणी : कर्जबाजारीपणा आणि फायनान्स कंपनीकडून कर्ज फेडण्यासाठी होत असलेला तगादा, याला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना पालम तालुक्यातील पुयनी येथे घडली. लालबा सूर्यभान सोळंके (वय ५० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुयनी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parbhani farmer death
कुटुंबात नऊ जण, कर्त्या पुरुषाने उचललं टोकाचं पाऊल, घरासमोरच स्वतःला संपवलं


परभणीच्या पालम तालुक्यातील पुयनी येथील शेतकरी लालबा सूर्यभान सोळंके यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून २५ हजार रुपये आणि महिंद्रा होम फायनान्सकडून दीड लाख रुपयाचे कर्ज उचलले होते. मात्र शेतामध्ये सतत होत असलेल्या नापिकीने शेतकरी सोळंके यांच्यासमोर कर्ज कसे फेडावे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. शेतकरी सोळंके यांना कर्ज फेडावे यासाठी महिंद्रा होम फायनान्स कंपनीकडून तगादा लावण्यात आला होता.

तू माझी बायको होणार आहेस; महिलेवर ११ वर्षांपासून अत्याचार, अंगावर डिझेल ओतून मारण्याचा प्रयत्न
घेतलेले दीड लाख रुपये कर्ज फेडावे यासाठी फायनान्स कंपनीकडून शेतकरी सोळंके यांना तीन वेळा नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर सोमवारी पहाटे लालबा सोळंके यांनी घरासमोर अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे.

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप, नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक
मृत लालबा सोळंके यांचे पालम येथील रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने पुयनी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख