जालना शहरातील व्यापारी, उद्योजकाच्या सुपारी हल्ले व हत्या प्रकरणातील राजेश नाहर यांच्या झालेल्या खून प्रकरणात आम आदमी पार्टीचे कैलास फुलारी यांनी केलेल्या तक्रारी संबंधितांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री राजेश टोपे हे पत्रकार परिषदेतच संतापले. आपल्याला कोणीही कमी समजू नये, खूप दूरवर नेऊन पोहचवू शकतो असे म्हणत माध्यमातून बातमी छापण्यापूर्वी शहानिशा करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाात विनाकारण बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात त्याच्या वजनाच्या इतका दावा ठोकण्याचा इशारा टोपे यांनी यावेळी दिला.
...अन पालकमंत्री टोपे संतापले
जालना शहरातील व्यापारी, उद्योजकाच्या सुपारी हल्ले व हत्या प्रकरणातील राजेश नाहर यांच्या झालेल्या खून प्रकरणात आम आदमी पार्टीचे कैलास फुलारी यांनी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2020, 4:00 am