म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
कोयत्याचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी टेम्पोसह ४ लाख रुपयांच्या कोंबड्या लंपास केल्या आहेत. राजगुरुनगर येथे सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
म्हाळुंगे, कळंब (ता. मंचर) येथील सिद्धिविनायक पोल्ट्री फार्ममधून कोंबड्या घेऊन टेम्पो मुंबईकडे जात होता. कोंबड्यांचे वजन साडेचार टन होते. या दरम्यान, रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील शिरोली (ता. खेड) येथे टेम्पो आला असता चोरट्यांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावली. टेम्पो थांबताच जवळच दबा धरून बसलेल्या सहा अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधील अक्रम खान (वय २८), अब्दुलगणी अब्दुल (वय २९), टिपूसुलतान शेख (वय ४५, सर्व रा. वडाळा, मुंबई) यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून खाली उतरवले. त्यांना शेजारील झुडपात नेऊन मोबाइल काढून घेतले. दरम्यान, तीन चोरटे त्यांच्याबरोबर थांबले आणि तिघे कोंबड्यासह टेम्पो घेऊन गेले. चार तासांनी तिघे चोरटे रिकामा टेम्पो घेऊन तेथे आले. त्यांनी खान यांना टेम्पो दिला आणि ‘आम्ही गेल्यानंतर अर्ध्या तासाने येथून जा,’ असे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
कोयत्याचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी टेम्पोसह ४ लाख रुपयांच्या कोंबड्या लंपास केल्या आहेत. राजगुरुनगर येथे सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
म्हाळुंगे, कळंब (ता. मंचर) येथील सिद्धिविनायक पोल्ट्री फार्ममधून कोंबड्या घेऊन टेम्पो मुंबईकडे जात होता. कोंबड्यांचे वजन साडेचार टन होते. या दरम्यान, रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील शिरोली (ता. खेड) येथे टेम्पो आला असता चोरट्यांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावली. टेम्पो थांबताच जवळच दबा धरून बसलेल्या सहा अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधील अक्रम खान (वय २८), अब्दुलगणी अब्दुल (वय २९), टिपूसुलतान शेख (वय ४५, सर्व रा. वडाळा, मुंबई) यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून खाली उतरवले. त्यांना शेजारील झुडपात नेऊन मोबाइल काढून घेतले. दरम्यान, तीन चोरटे त्यांच्याबरोबर थांबले आणि तिघे कोंबड्यासह टेम्पो घेऊन गेले. चार तासांनी तिघे चोरटे रिकामा टेम्पो घेऊन तेथे आले. त्यांनी खान यांना टेम्पो दिला आणि ‘आम्ही गेल्यानंतर अर्ध्या तासाने येथून जा,’ असे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.