अ‍ॅपशहर

मृताच्या वारसांना १७ लाखांची भरपाई

रिक्षा उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मयताच्या वारसांना १७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायधिकरणाचे न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या कोर्टाने दिला आहे.

Maharashtra Times 10 Jan 2018, 3:00 am
मोटार अपघात न्यायाधिकरणाचा निकाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 lakh relief to family of road accident victim in pune
मृताच्या वारसांना १७ लाखांची भरपाई


म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिक्षा उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मयताच्या वारसांना १७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायधिकरणाचे न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या कोर्टाने दिला आहे.
एस. टी. महामंडळातील कर्मचारी भीमराव अर्जुन कळसकर (वय ५२) यांचा अपघातात मृत्यू झाला. कळसकर हे १४ नोव्हेंबर २००८ रोजी पत्नीबरोबर रिक्षाने शिवाजीनगर येथून घरी जात होते. रिक्षाचालक मुशाक अल्लाबक्ष अलेमल हा वेगाने आणि निष्काळजीपणे रिक्षा चालवत होता. त्यामुळे त्याचा ताबा सुटून शनिवारवाड्या जवळ कसबा पेठ पोलिस चौकीसमोर रिक्षा पलटी झाली.
भीमराव कळसकर हे रिक्षाखाली येऊन गंभीर जखमी झाले. चौकातील पोलिसांनी अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. उपचारांदरम्यान कळसकर यांचा २३ नोव्हेंबर २००८ रोजी मृत्यू झाला होता. कळसकर यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांना भरपाई मिळावी यासाठी कोर्टात दावा दाखल केला होता. त्यांच्यातर्फे अॅड. विजय राऊत यांनी कोर्टात दावा दाखल केला होता. रिक्षाचालक मुशाक अलमेल, रिक्षामालक उमा जोशी, मे. इपको टोकियो जनरल इन्श्युरन्स कंपनी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अर्जदारांच्या बाजूने निकाल दिला. मृताच्या वारसांना १७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज