दोन मे पासून अंमलबजावणीचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने २५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत येत्या दोन मे पासून शहरात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी दिली.
पाणीकपातीसंदर्भात महापालिकेत सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना महापौर काळजे म्हणाले, ‘गेल्या वर्षी पवना धरणात याच दिवशी २६.६५ टक्के पाणीसाठा होता. तो आजमितीस ३८ टक्के आहे. यंदाचा पाऊस सरासरी इतका होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी शहराची वाढलेली लोकसंख्या आणि वाढलेला पाणीउपसा लक्षात घेतला पाहिजे. प्रत्यक्ष पावसाळा होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणी जपून वापरले पाहिजे. त्याअनुषंगाने पाणीबचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहे.’
‘पाणी वाचवा-पाणी वाढवा’ उपक्रमांतर्गत पालिकेने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यामध्ये नागरिकांनी नळ अर्धा किंवा पाऊण उघडावा, पाणी शिळे होते हा गैरसमज मनातून काढून टाकावा, दोन नियंत्रणे (ड्युअल टॅप) असलेला फ्लशिंग टँक वापरावा, शॉवरचा वापर टाळावा, टाक्यांमधून पाणी ओव्हरफ्लो होणार नाही याची काळजी घ्यावी, पूर्व परवानगीने जुने कनेक्शन बदलावे, घरातील नळ, पाइप, फ्लश वेळेत दुरुस्त करावेत या बाबींचा समावेश आहे.
याशिवाय नळांना नोझल्स बसवावे, वॉशिंग मशिनचा वापर पूर्ण क्षमतेने करावा, कूपनलिकेच्या पाण्याची उधळपट्टी टाळावी, वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, घरातील फरशी धुण्याऐवजी पुसून काढावी, भांडी धुताना पाण्याचा पुर्नवापर करावा, बाथटबचा वापर करू नये, मोठ्या सोसायट्यांनी जलतरण तलाव बंद करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पाणी आयोगाच्या माहितीनुसार आपण काय करतो, काय केले पाहिजे, पाण्याची किती बचत होते, याविषयी माहिती जाहीर करण्यात आली आहे.
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने २५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत येत्या दोन मे पासून शहरात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी दिली.
पाणीकपातीसंदर्भात महापालिकेत सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना महापौर काळजे म्हणाले, ‘गेल्या वर्षी पवना धरणात याच दिवशी २६.६५ टक्के पाणीसाठा होता. तो आजमितीस ३८ टक्के आहे. यंदाचा पाऊस सरासरी इतका होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी शहराची वाढलेली लोकसंख्या आणि वाढलेला पाणीउपसा लक्षात घेतला पाहिजे. प्रत्यक्ष पावसाळा होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणी जपून वापरले पाहिजे. त्याअनुषंगाने पाणीबचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहे.’
‘पाणी वाचवा-पाणी वाढवा’ उपक्रमांतर्गत पालिकेने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यामध्ये नागरिकांनी नळ अर्धा किंवा पाऊण उघडावा, पाणी शिळे होते हा गैरसमज मनातून काढून टाकावा, दोन नियंत्रणे (ड्युअल टॅप) असलेला फ्लशिंग टँक वापरावा, शॉवरचा वापर टाळावा, टाक्यांमधून पाणी ओव्हरफ्लो होणार नाही याची काळजी घ्यावी, पूर्व परवानगीने जुने कनेक्शन बदलावे, घरातील नळ, पाइप, फ्लश वेळेत दुरुस्त करावेत या बाबींचा समावेश आहे.
याशिवाय नळांना नोझल्स बसवावे, वॉशिंग मशिनचा वापर पूर्ण क्षमतेने करावा, कूपनलिकेच्या पाण्याची उधळपट्टी टाळावी, वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, घरातील फरशी धुण्याऐवजी पुसून काढावी, भांडी धुताना पाण्याचा पुर्नवापर करावा, बाथटबचा वापर करू नये, मोठ्या सोसायट्यांनी जलतरण तलाव बंद करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पाणी आयोगाच्या माहितीनुसार आपण काय करतो, काय केले पाहिजे, पाण्याची किती बचत होते, याविषयी माहिती जाहीर करण्यात आली आहे.