सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २५०० जण अपात्र
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सेट परीक्षेच्या ओएमआर शीटवर बैठक क्रमांक शाईने गडद करताना झालेल्या चुकीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुमारे अडीच हजार परीक्षार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे विद्यापीठाने मूल्यमापन संगणकीय प्रणालीने न करता तपासनीसांद्वारे करण्यात यावे, अशी मागणी आता परीक्षार्थी करत आहेत. तसेच, परीक्षार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून विद्यापीठाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही परीक्षार्थ्यांनी केली आहे.
परीक्षार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक क्रमांक, प्रश्नसंच संकेतांक आदी माहिती उत्तरपत्रिकेवरील वर्तुळाला शाईने गडद करून भरायची होती. मात्र, काही परीक्षार्थ्यांकडून ही प्रक्रिया राहून गेल्याने, तसेच काहींकडून काही तांत्रिक चुका झाल्याने त्यांना विद्यापीठाने शून्य गुण दिले आहेत. यामुळे अडीच हजार परीक्षार्थी अपात्र ठरले आहेत. कोल्हापूर येथील परीक्षा केंद्रावरील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्या होत्या. त्यांचे मूल्यमापन संगकीय प्रणालीद्वारे न करता व्यक्तीने केले आहे. त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होत असतील, तर आमचेही गुण जाहीर करा अशी मागणी आता परीक्षार्थी करत आहेत.
योगेश ठाकूर म्हणाले, ‘ओएमआर शीटवर चूक झाली असेल, तर निकाल जाहीर करण्यात येत नाही. तरीही काही परीक्षार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आमचे निकालही लवकर जाहीर करावेत. तसेच कोल्हापूर केंद्रावरील विद्यार्थ्यांना जो नियम वापरला, तोच नियम इतर विद्यार्थ्यांना वापरावा. आम्हाला तांत्रिक बाबी म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे.’ याबाबत जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर म्हणाले, ‘विद्यापीठ प्रशासन वारंवार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर या प्रश्नावर लक्ष घालावे.’ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी परीक्षार्थ्यांबाबत त्वरित कारवाई करून त्यांना न्याय घेण्याची मागणी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे केली आहे.
...
सेटच्या परीक्षेत नेमका काय प्रकार घडला आहे, याबाबत माहिती घेत आहोत. माहिती तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या विषयासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा करण्यात येईल.
- डॉ. अरविंद शाळीग्राम, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सेट परीक्षेच्या ओएमआर शीटवर बैठक क्रमांक शाईने गडद करताना झालेल्या चुकीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुमारे अडीच हजार परीक्षार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे विद्यापीठाने मूल्यमापन संगणकीय प्रणालीने न करता तपासनीसांद्वारे करण्यात यावे, अशी मागणी आता परीक्षार्थी करत आहेत. तसेच, परीक्षार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून विद्यापीठाने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही परीक्षार्थ्यांनी केली आहे.
परीक्षार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणून ओएमआर शीट देण्यात आल्या होत्या. त्यावर बैठक क्रमांक, प्रश्नसंच संकेतांक आदी माहिती उत्तरपत्रिकेवरील वर्तुळाला शाईने गडद करून भरायची होती. मात्र, काही परीक्षार्थ्यांकडून ही प्रक्रिया राहून गेल्याने, तसेच काहींकडून काही तांत्रिक चुका झाल्याने त्यांना विद्यापीठाने शून्य गुण दिले आहेत. यामुळे अडीच हजार परीक्षार्थी अपात्र ठरले आहेत. कोल्हापूर येथील परीक्षा केंद्रावरील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्या होत्या. त्यांचे मूल्यमापन संगकीय प्रणालीद्वारे न करता व्यक्तीने केले आहे. त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होत असतील, तर आमचेही गुण जाहीर करा अशी मागणी आता परीक्षार्थी करत आहेत.
योगेश ठाकूर म्हणाले, ‘ओएमआर शीटवर चूक झाली असेल, तर निकाल जाहीर करण्यात येत नाही. तरीही काही परीक्षार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आमचे निकालही लवकर जाहीर करावेत. तसेच कोल्हापूर केंद्रावरील विद्यार्थ्यांना जो नियम वापरला, तोच नियम इतर विद्यार्थ्यांना वापरावा. आम्हाला तांत्रिक बाबी म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे.’ याबाबत जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर म्हणाले, ‘विद्यापीठ प्रशासन वारंवार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर या प्रश्नावर लक्ष घालावे.’ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी परीक्षार्थ्यांबाबत त्वरित कारवाई करून त्यांना न्याय घेण्याची मागणी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे केली आहे.
...
सेटच्या परीक्षेत नेमका काय प्रकार घडला आहे, याबाबत माहिती घेत आहोत. माहिती तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या विषयासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा करण्यात येईल.
- डॉ. अरविंद शाळीग्राम, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ