म. टा. प्रतिनिधी, पुणे
यंदा दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमधून कमालीचा धूर बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. त्या धुरामुळे पुणेकरांच्या श्वसनविकारात वाढ होऊन अस्थमा, सीओपीडीचा आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा करोनामुळे फटाके कमी उडवावेत असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेयंदा फटाके काहीसे कमी वाजविले गेले असले, तरी फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडल्याने श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.
'श्वसनविकारासह इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण वाढते. दमा, तसेच अॅलर्जीची प्रतिक्रिया उद्भवते. दिवाळीच्या प्रदूषित वातावरणामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, डोकेदुखी, श्वास लागणे, जास्त प्रमाणात झोप येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात वेदना होऊ शकतात,' असे निरीक्षण कोलंबिया एशिया रुग्णालयातील डॉ. अरुण सुराडकर यांनी नोंदविले.
संसर्ग रोगतज्ज्ञ डॉ. महेश लाखे म्हणाले, 'फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांना श्वास घेण्यात अडचण येत आहे. वाहणारे नाक, घसा खवखवणे, दमा लागण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रदूषणामुळे विषाणूजन्य आणि जीवाणूच्या न्यूमोनियाचा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फुफ्फुस व कर्करोगाचा आजार असलेल्या रुग्णांना सीओपीडी तसेच दम्याचा त्रास होऊ शकतो. तीव्र खोकला, वाहते नाक, शिंका येणे, त्वचेची जळजळ होते. त्यामुळे आता लहान मुलांसह ज्येष्ठांनी काळजी घेणे गरजेचे आहे.'
गेल्या वर्षीपेक्षा यंदा फटाके कमी वाजविण्यात आले. मात्र, दिवाळीत जे फटाके वाजले त्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला. परिणामी श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांना मागील काही दिवसांपासून वारंवार रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहेत. श्वसनविकार असणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के रुग्णांच्या त्रासात भर पडली आहे.
- डॉ. अजित कुलकर्णी, छातीरोग तज्ज्ञ
करोना संसर्ग वाढण्याची भीती
फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा करोनाचा धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवेत सल्फरडाय ऑक्साइड, कार्बनडाय ऑक्साइड, मोनो ऑक्साइड आणि काही घातक पदार्थ हवेत मोठ्या प्रमाणात पसरतात. त्याचा परिणाम श्वसन यंत्रणा, मेंदूवर अधिक होतो. फटाक्यांमध्ये असणाऱ्या लहान शिशाचे तुकड्यांचाही आरोग्यावर परिणाम होतो. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
यंदा दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमधून कमालीचा धूर बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. त्या धुरामुळे पुणेकरांच्या श्वसनविकारात वाढ होऊन अस्थमा, सीओपीडीचा आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा करोनामुळे फटाके कमी उडवावेत असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेयंदा फटाके काहीसे कमी वाजविले गेले असले, तरी फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडल्याने श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.
'श्वसनविकारासह इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण वाढते. दमा, तसेच अॅलर्जीची प्रतिक्रिया उद्भवते. दिवाळीच्या प्रदूषित वातावरणामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, डोकेदुखी, श्वास लागणे, जास्त प्रमाणात झोप येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात वेदना होऊ शकतात,' असे निरीक्षण कोलंबिया एशिया रुग्णालयातील डॉ. अरुण सुराडकर यांनी नोंदविले.
संसर्ग रोगतज्ज्ञ डॉ. महेश लाखे म्हणाले, 'फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांना श्वास घेण्यात अडचण येत आहे. वाहणारे नाक, घसा खवखवणे, दमा लागण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रदूषणामुळे विषाणूजन्य आणि जीवाणूच्या न्यूमोनियाचा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फुफ्फुस व कर्करोगाचा आजार असलेल्या रुग्णांना सीओपीडी तसेच दम्याचा त्रास होऊ शकतो. तीव्र खोकला, वाहते नाक, शिंका येणे, त्वचेची जळजळ होते. त्यामुळे आता लहान मुलांसह ज्येष्ठांनी काळजी घेणे गरजेचे आहे.'
गेल्या वर्षीपेक्षा यंदा फटाके कमी वाजविण्यात आले. मात्र, दिवाळीत जे फटाके वाजले त्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला. परिणामी श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांना मागील काही दिवसांपासून वारंवार रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहेत. श्वसनविकार असणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के रुग्णांच्या त्रासात भर पडली आहे.
- डॉ. अजित कुलकर्णी, छातीरोग तज्ज्ञ
करोना संसर्ग वाढण्याची भीती
फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा करोनाचा धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे हवेत सल्फरडाय ऑक्साइड, कार्बनडाय ऑक्साइड, मोनो ऑक्साइड आणि काही घातक पदार्थ हवेत मोठ्या प्रमाणात पसरतात. त्याचा परिणाम श्वसन यंत्रणा, मेंदूवर अधिक होतो. फटाक्यांमध्ये असणाऱ्या लहान शिशाचे तुकड्यांचाही आरोग्यावर परिणाम होतो. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.