म. टा. प्रतिनिधी, पुणे
'एखाद्याचा अपमान करण्यासाठी त्यास 'आई-बहिणी'वरून शिवी दिली जाते. या कृतीमुळे स्त्रियांची नालस्ती होते; तसेच त्यांना पुरुषांच्या तुलनेत कस्पटासमान लेखले जाण्याची व्यवस्था आणखी भक्कम होत असते. स्त्री-पुरुष विषमतेच्या अशा मुळांवरच घाव घालण्यासाठी 'आई-बहिणी'वरून शिवी देणाऱ्या व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी नोटीस द्या,' अशी मागणी समता हक्क मोर्चाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.
देशव्यापी संपाअंतर्गत बुधवारी कष्टकरी स्त्री संघटनांनी मोर्चा काढला होता. त्याची सांगता दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या शिष्टमंडळाने राम यांना भेटून निवेदन दिले. शिष्टमंडळात शेतमजूर संघटनेच्या अध्यक्ष संगीता कामठे, हमाल पंचायत मातेरे वेचक संघटनेच्या सुमन गायकवाड, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राजश्री घोरपडे, युनिक एज्युकेशनल फाउंडेशन या बचत गट शिखर संस्थेच्या पौर्णिमा जगधने आदी सहभागी होत्या. पुण्यात भिडे वाड्यात फुले दाम्पत्याने देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा वटवृक्ष लावला. त्याच पुण्याची परंपरा पुढे नेण्यासाठी स्त्रियांचा आत्मसन्मान जपणारी लक्षवेधी मागणी आज केली, असे पवार यांनी या वेळी नमूद केले.
स्त्रीला माणूस न समजता, उपभोगाची वस्तू समजण्याच्या मानसिकतेत स्त्री अत्याचाराचे मूळ आहे. ही मानसिकता बदलणे ही समाजाप्रमाणेच सरकारचीही जबाबदारी आहे. कुटुंब समाजातील घाणीची, स्वच्छतेची कामे महिलांना करावी लागतात, अशी कामे पुरुषांनीही करण्याची आणि आई-बहिणीवरून शिवी न देण्याविषयी जागृती करण्यासाठी शालेय स्तरापासून प्रतिज्ञा, गाणी, गोष्टी, पाठ्यक्रम, श्रम संस्कार या माध्यमातून जाणीव निर्माण केली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हैदराबाद, उन्नाव, कठुवा येथील स्त्री-अत्याचाराचा निषेध म्हणून बहुसंख्य मोर्चेकऱ्यांनी काळे कपडे घातले होते, तर इतर रंगाचा पेहराव करणाऱ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. स्त्री आणि पुरुष समान आहेत, असे सांगणारे मुखवटे सर्वांनी लावले होते.
'एखाद्याचा अपमान करण्यासाठी त्यास 'आई-बहिणी'वरून शिवी दिली जाते. या कृतीमुळे स्त्रियांची नालस्ती होते; तसेच त्यांना पुरुषांच्या तुलनेत कस्पटासमान लेखले जाण्याची व्यवस्था आणखी भक्कम होत असते. स्त्री-पुरुष विषमतेच्या अशा मुळांवरच घाव घालण्यासाठी 'आई-बहिणी'वरून शिवी देणाऱ्या व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी नोटीस द्या,' अशी मागणी समता हक्क मोर्चाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.
देशव्यापी संपाअंतर्गत बुधवारी कष्टकरी स्त्री संघटनांनी मोर्चा काढला होता. त्याची सांगता दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या शिष्टमंडळाने राम यांना भेटून निवेदन दिले. शिष्टमंडळात शेतमजूर संघटनेच्या अध्यक्ष संगीता कामठे, हमाल पंचायत मातेरे वेचक संघटनेच्या सुमन गायकवाड, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राजश्री घोरपडे, युनिक एज्युकेशनल फाउंडेशन या बचत गट शिखर संस्थेच्या पौर्णिमा जगधने आदी सहभागी होत्या. पुण्यात भिडे वाड्यात फुले दाम्पत्याने देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा वटवृक्ष लावला. त्याच पुण्याची परंपरा पुढे नेण्यासाठी स्त्रियांचा आत्मसन्मान जपणारी लक्षवेधी मागणी आज केली, असे पवार यांनी या वेळी नमूद केले.
स्त्रीला माणूस न समजता, उपभोगाची वस्तू समजण्याच्या मानसिकतेत स्त्री अत्याचाराचे मूळ आहे. ही मानसिकता बदलणे ही समाजाप्रमाणेच सरकारचीही जबाबदारी आहे. कुटुंब समाजातील घाणीची, स्वच्छतेची कामे महिलांना करावी लागतात, अशी कामे पुरुषांनीही करण्याची आणि आई-बहिणीवरून शिवी न देण्याविषयी जागृती करण्यासाठी शालेय स्तरापासून प्रतिज्ञा, गाणी, गोष्टी, पाठ्यक्रम, श्रम संस्कार या माध्यमातून जाणीव निर्माण केली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हैदराबाद, उन्नाव, कठुवा येथील स्त्री-अत्याचाराचा निषेध म्हणून बहुसंख्य मोर्चेकऱ्यांनी काळे कपडे घातले होते, तर इतर रंगाचा पेहराव करणाऱ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या. स्त्री आणि पुरुष समान आहेत, असे सांगणारे मुखवटे सर्वांनी लावले होते.